साहित्य संमेलने मराठी साहित्यात कोणती मोलाची भर घालतात याचा विचार होणे आवश्यक आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष हे राष्ट्रपतीपदाप्रमाणे शोभेचे पद आहे का ? याचाही विचार व्हायला हवा. घटनात्मक अधिकार नसलेल्या संमेलनाध्यक्षपदाच्या आधारे कोणताही अध्यक्ष मराठी साहित्याचा सर्वांगिण विकास करू शकत नाही.हजारो वर्षापूर्वी लिहिला गेलेला मराठी भाषेतील पहिला शिलालेख श्रवणबे
ळगोळ
येथे गोमटेश्वराच्या पुतळ्याखाली आढळतो. तर मराठीतील आद्यग्रंथ म्हणून
`ज्ञानेश्वरीचा’ उल्लेख करतात. मातृभाषेचे महत्त्व ओळखून ज्ञानेश्वरांनी
संस्कृत भाषेतील भगवद्गीता प्राकृत भाषेत अनुवादित केली. मातृभाषेबद्दल
असणारा आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात,
`माझिया मर्हाटीचि बोलु कवतुके
परी अमृतातेही पैजा जिंके ।।’
मराठी भाषेत अनेक थोर, विद्वान नररत्नांची खाण आढळते. श्रेष्ठ साहित्यिकांची यादी न संपणारी आहे. या सर्वांनीच मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यातील एक ठळक नाव म्हणजे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले !
चिपळूण येथे येत्या 12 ते 13 जानेवारी या कालावधीत होणार्या 86 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. कोत्तापल्ले यांची निवड झाली आहे. विविध वादांमुळे गाजलेल्या या निवडणुकीत डॉ. कोत्तापल्ले यांनी बाजी मारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
प्रत्येक पाच वर्षानंतर येणार्या सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक सालाबादप्रमाणे येत असते. सार्वत्रिक निवडणुकांनंतर राज्यकर्ते बदलले तरी सर्वसामान्य माणसाच्या जीवनमानात फारसा बदल होत नाही, उलट त्यांचे जीवन अधिक जिकरीचे, हलाखीचे आणि अधिक संघर्षमय बनते. मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीनंतर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात राजकीय अथवा आर्थिक बदल होत नसले तरी सामाजिक आणि सांस्कृतिक उलथापालथ मात्र होते हे नाकारता येत नाही. अन्न, वस्त्र, निवार्यासोबतच मनुष्याप्राण्याच्या जीवनप्रणालीमध्ये सांस्कृतिक महत्व मोलाचे असते. ही सांस्कृतिक जडण-घडण त्या त्या भाषेतील साहित्य निर्माण करते. ज्या भाषेत प्रगल्भ साहित्याची यशस्वी परंपरा असते त्या भाषेचा विकास आणि ती भाषा बोलणार्याची सांस्कृतिक बैठक पक्की झालेली असते. अलंकारचे लेणे ल्यालेल्या मराठी भाषेचा प्रगल्भ वारसा आणि गोडवा वादातीत आहे.
सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे साहित्य संमेलनाच्या निवडणुकीतही `राजकारण’ आणि काटशहाची लागण झाल्यामुळे बुध्दिवंत आणि सृजनशीलतेच्या पुजार्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. साहित्य संमेलनाप्रमाणेच नाटय़ संमेलनाच्या निवडणुकीनेही सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचे आपण यापूर्वी पाहिले आहे. हयातभर भांडवलदारांची तळी उचलून उच्च मध्यमवर्गीयांच्या तथाकथित वैफल्यग्रस्तपणाला गोंडस शब्दांचा मुलामा देण्याचे साहित्य जन्माला घालणार्या ह. मो. मराठे यांनी निवडणूक प्रचारात आपली `जात’कुळी दाखवून दिली. जेम्स लेन यांचे समर्थन करून मराठा समाजाचा तर ब्राम्हण्यवादाचा उघड उघड पुरस्कार करून हमोंनी दलित समाजाचा रेष ओoढावून घेतला. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत अशाप्रकारच्या प्रवृत्तीची ओळख करून देणार्या मराठय़ांना सुजान मतदारांनी आपली जागा दाखवून दिली.
साहित्यिक मंडळी अजून तरी जात अथवा विशिष्ट समाज पाहून मतदान करीत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ना.सी. फडके आणि यु.म. पठाणांपासून शंकरराव खरात, केशव मेश्राम, नारायण सुर्वेंपर्यंत वेगवेगळ्या समाजातील अभिजात साहित्यिकांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर, दुर्गा भागवत, गंगाधर गाडगीळ, गं. बा. सरदार, विश्राम बेडेकर, उत्तम कांबळे अशा वेगवेगळ्या विचारसरणीच्या मंडळींनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
1878 साली पुण्यात भरलेल्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे यांच्यापासून मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाकेपर्यंतच्या अध्यक्षांनी मराठी साहित्यात आपले योगदान अधोरेखित केले आहे. परंतु जे साहित्यिक निवडणुकीपासून दूर राहिले आणि कधीच साहित्य संमेलनाध्यक्ष बनले नाहीत अशा अनेक सारस्वतांनी सकस आणि समाजप्रबोधनात्मक लेखन करून माय मराठी अधिक समृध्द केलेली आहे.
हे सांगण्याचा प्रपंच इतकाच की, संमेलनाध्यक्ष झाल्यानंतरच मराठीची योग्यप्रकारे सेवा करता येऊ शकते असे नाही. नवादित कवी आणि कथा, कविता, नाटक, कादंबरी, ललित, विनोद आणि लेख लिहिणारी मंडळीही आपापल्या कुवतीनुसार साहित्यसेवा करीत असते. काळाच्या कसोटीवर त्यांच्या साहित्याचे मोजमाप होईलही. जे सकस, युगप्रवर्तक, काळाच्या पुढे जाणारे, एकूणच दिशादर्शन करणारे साहित्य असेल ते अजरामरच राहिल. दिवसेंदिवस मराठी साहित्य अधिक प्रगल्भ आणि सकस होत जाणार यात शंका नाही. वेगवेगळ्या समाजातील, गावकुसाबाहेरील, डोंगरदर्यातील समूह जेव्हा आपली वेदना, म्हणणे, गार्हाणे, जीवनातील संघर्ष, स्वप्ने, आशा-आकांक्षा शब्दबध्द करतो त्या त्यावेळी साहित्य अधिक माणसाळते. साहित्याला माणसाचा लळा लागतो. जागतिक पातळीवर त्याचे प्रतिध्वनी उमटू लागतात. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य साहित्यात असते.
या सर्व पार्श्वभूमीवर साहित्य संमेलने मराठी साहित्यात कोणती मोलाची भर घालतात याचा विचार होणे आवश्यक आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष हे राष्ट्रपतीपदाप्रमाणे शोभेचे पद आहे का ? याचाही विचार व्हायला हवा. घटनात्मक अधिकार नसलेल्या संमेलनाध्यक्षपदाच्या आधारे कोणताही अध्यक्ष मराठी साहित्याचा सर्वांगिण विकास करू शकत नाही. सरकारी देणगीच्या शिदोरीवर तीन दिवसांची `वाङमयीन जत्रा’ भरवून वर्षभर सभा-संमेलनात मिरविणे, मानधन घेऊन उद्घाटने करीत गावोगाव भटकणे, दूरचित्रवाणीवरून रसिकांची भेट घेणे आणि महत्वाचे म्हणजे, संमेलनाच्या समारोपप्रसंगी कधीही पूर्ण न होणारे ठराव करून सामाजिक काम केल्याचे नपुंसक समाधान मानणे इतकेच अध्यक्षाच्या हाती उरते. अध्यक्षीय भाषणांमधून आपल्या विद्वतेचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानणारे अध्यक्ष साहित्य सेवेसाठी आपण कोणते कार्य हाती घेऊन ते सिध्दीस नेणार आहोत याचा खुलासा करीत नाहीत. अथवा, संकल्पित कामांचा पाठपुरावा करीत नाहीत. साहित्य महामंडळही कोणत्याही प्रकारच्या कार्यशाळा, लेखन शिबिरे, चर्चासत्रे यांचे आयोजन करताना दिसत नाहीत. साहित्यासोबतच समाजातील अपप्रवृतीच्या विरोधात उभे ठाकण्याचे काम महामंडळ किवा संमेलनाध्यक्ष करीत नाही. समाजातील ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर येण्याचे टाळण्याची कातडेबचाव प्रवृत्ती साहित्यिकांमध्ये बोकाळली आहे. चार भिंतीत बसून आपल्या साहित्य कृतीतून बराक ओबामापासून पंतप्रधान आणि पाकिस्तानला इशारे देणारी ही मंडळी आपल्या हक्कासाठी साध्या रिक्षाचालकाशी बोलताना वचकून असतात.
मराठी साहित्य प्रवाहात वेगवेगळे विचार, आचार, प्रवृती, इझम आहेत. तसेच, प्रस्थापित विरूध्द नवोदित असा संघर्ष पूर्वीपासूच चालत आला आहे. कलेसाठी पताका मिरविणारा आणि सामाजिक बांधिलकी मानणारा असे दोन ठळक गट असल्यामुळे या दोघांमध्ये पूर्वपरंपरागत द्वंद्व सुरू आहे. यातूनच लिटिल मॅगझिनची चळवळ, दलित साहित्य, ग्रामिण साहित्य, आदिवासी साहित्य, महिला साहित्य, विद्रोही साहित्य, ख्रिस्ती आणि मुस्लीम साहित्य निर्माण होऊन त्यांनी स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाप्रमाणेच ही मंडळीही आपापल्या कुवतीप्रमाणे संमेलने भरवत असतात. तसेच, अनियतकालिके आणि मासिकांमधून आपल्या विचारांचा आणि साहित्याचे प्रचार आणि प्रसार करीत असतात. प्रत्येक साहित्यप्रेमी आपापल्या कुवतीप्रमाणे साहित्यसेवा करीत असतो.
मराठी साहित्याचा खर्या अर्थाने प्रसार करायचा असेल तर अधिक सकस साहित्यनिर्मितीसोबतच नव्या माहिती तंत्रज्ञानाचा आधार घ्यायला हवा. बदलत्या काळासोबत मराठीनेही बदलायला हवे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नव्याने येणार्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द निर्माण करून मराठी भाषा अधिक समृध्द करायला हवी. मराठी भाषेत नवे नवे ब्लॉग, मराठीची विविध संकेतस्थळे निर्माण करायला हवीत. हल्लीच्या मराठी तरूणांच्या भावविश्वाला स्पर्श करून त्यांना मराठी साहित्याकडे वळविण्याची आज खरी गरज आहे. अनिष्ठ रूढी, परंपरा, अंधश्रध्दा यांच्यावर आसूड ओढणार्या साहित्याची निर्मिती करून शास्त्रीय दृष्टीकोन मांडणारे लेखन विपुल प्रमाणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखता येतील याचा विचार महामंडळ आणि साहित्य संमेलनांनी करायला हवा.
`कलेसाठी कला की, जीवनासाठी कला’ या पौराणिक वादाची अद्याप गाठ सुटली नसली तरी `जीवनासाठी अभिजात कला’जोपासता येऊ शकते, या मताचा मी आहे. तीन दिवसांच्या `साहित्य जत्रे’मुळे एकमेकांच्या भेटीगाठी होतात, नवोदितांना हुरूप येतो, पुस्तकांची विक्री होते, काही प्रमाणात मराठी साहित्याच्या भवितव्याबाबत डोळे ओले केले जातात हे मान्य असले तरी, अधिक सकस, विचारप्रवर्तक, समाजपयोगी साहित्य निर्मितीसाठी काय ठोस करता येऊ शकते यांचा गांभिर्याने विचार व्हायला हवा. अन्यथा, संत ज्ञानेश्वर जरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले तरी मराठीचे काही भले होणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे.
`माझिया मर्हाटीचि बोलु कवतुके
परी अमृतातेही पैजा जिंके ।।’
मराठी भाषेत अनेक थोर, विद्वान नररत्नांची खाण आढळते. श्रेष्ठ साहित्यिकांची यादी न संपणारी आहे. या सर्वांनीच मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. त्यातील एक ठळक नाव म्हणजे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले !
चिपळूण येथे येत्या 12 ते 13 जानेवारी या कालावधीत होणार्या 86 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक डॉ. कोत्तापल्ले यांची निवड झाली आहे. विविध वादांमुळे गाजलेल्या या निवडणुकीत डॉ. कोत्तापल्ले यांनी बाजी मारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन!
प्रत्येक पाच वर्षानंतर येणार्या सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक सालाबादप्रमाणे येत असते. सार्वत्रिक निवडणुकांनंतर राज्यकर्ते बदलले तरी सर्वसामान्य माणसाच्या जीवनमानात फारसा बदल होत नाही, उलट त्यांचे जीवन अधिक जिकरीचे, हलाखीचे आणि अधिक संघर्षमय बनते. मराठी साहित्य संमेलनाच्या निवडणुकीनंतर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात राजकीय अथवा आर्थिक बदल होत नसले तरी सामाजिक आणि सांस्कृतिक उलथापालथ मात्र होते हे नाकारता येत नाही. अन्न, वस्त्र, निवार्यासोबतच मनुष्याप्राण्याच्या जीवनप्रणालीमध्ये सांस्कृतिक महत्व मोलाचे असते. ही सांस्कृतिक जडण-घडण त्या त्या भाषेतील साहित्य निर्माण करते. ज्या भाषेत प्रगल्भ साहित्याची यशस्वी परंपरा असते त्या भाषेचा विकास आणि ती भाषा बोलणार्याची सांस्कृतिक बैठक पक्की झालेली असते. अलंकारचे लेणे ल्यालेल्या मराठी भाषेचा प्रगल्भ वारसा आणि गोडवा वादातीत आहे.
सार्वत्रिक निवडणुकांप्रमाणे साहित्य संमेलनाच्या निवडणुकीतही `राजकारण’ आणि काटशहाची लागण झाल्यामुळे बुध्दिवंत आणि सृजनशीलतेच्या पुजार्यांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. साहित्य संमेलनाप्रमाणेच नाटय़ संमेलनाच्या निवडणुकीनेही सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचे आपण यापूर्वी पाहिले आहे. हयातभर भांडवलदारांची तळी उचलून उच्च मध्यमवर्गीयांच्या तथाकथित वैफल्यग्रस्तपणाला गोंडस शब्दांचा मुलामा देण्याचे साहित्य जन्माला घालणार्या ह. मो. मराठे यांनी निवडणूक प्रचारात आपली `जात’कुळी दाखवून दिली. जेम्स लेन यांचे समर्थन करून मराठा समाजाचा तर ब्राम्हण्यवादाचा उघड उघड पुरस्कार करून हमोंनी दलित समाजाचा रेष ओoढावून घेतला. साहित्य संमेलनाच्या निवडणुकीत अशाप्रकारच्या प्रवृत्तीची ओळख करून देणार्या मराठय़ांना सुजान मतदारांनी आपली जागा दाखवून दिली.
साहित्यिक मंडळी अजून तरी जात अथवा विशिष्ट समाज पाहून मतदान करीत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ना.सी. फडके आणि यु.म. पठाणांपासून शंकरराव खरात, केशव मेश्राम, नारायण सुर्वेंपर्यंत वेगवेगळ्या समाजातील अभिजात साहित्यिकांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. इतकेच नव्हे तर, दुर्गा भागवत, गंगाधर गाडगीळ, गं. बा. सरदार, विश्राम बेडेकर, उत्तम कांबळे अशा वेगवेगळ्या विचारसरणीच्या मंडळींनी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
1878 साली पुण्यात भरलेल्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महादेव गोविंद रानडे यांच्यापासून मावळते अध्यक्ष वसंत आबाजी डहाकेपर्यंतच्या अध्यक्षांनी मराठी साहित्यात आपले योगदान अधोरेखित केले आहे. परंतु जे साहित्यिक निवडणुकीपासून दूर राहिले आणि कधीच साहित्य संमेलनाध्यक्ष बनले नाहीत अशा अनेक सारस्वतांनी सकस आणि समाजप्रबोधनात्मक लेखन करून माय मराठी अधिक समृध्द केलेली आहे.
हे सांगण्याचा प्रपंच इतकाच की, संमेलनाध्यक्ष झाल्यानंतरच मराठीची योग्यप्रकारे सेवा करता येऊ शकते असे नाही. नवादित कवी आणि कथा, कविता, नाटक, कादंबरी, ललित, विनोद आणि लेख लिहिणारी मंडळीही आपापल्या कुवतीनुसार साहित्यसेवा करीत असते. काळाच्या कसोटीवर त्यांच्या साहित्याचे मोजमाप होईलही. जे सकस, युगप्रवर्तक, काळाच्या पुढे जाणारे, एकूणच दिशादर्शन करणारे साहित्य असेल ते अजरामरच राहिल. दिवसेंदिवस मराठी साहित्य अधिक प्रगल्भ आणि सकस होत जाणार यात शंका नाही. वेगवेगळ्या समाजातील, गावकुसाबाहेरील, डोंगरदर्यातील समूह जेव्हा आपली वेदना, म्हणणे, गार्हाणे, जीवनातील संघर्ष, स्वप्ने, आशा-आकांक्षा शब्दबध्द करतो त्या त्यावेळी साहित्य अधिक माणसाळते. साहित्याला माणसाचा लळा लागतो. जागतिक पातळीवर त्याचे प्रतिध्वनी उमटू लागतात. सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचे सामर्थ्य साहित्यात असते.
या सर्व पार्श्वभूमीवर साहित्य संमेलने मराठी साहित्यात कोणती मोलाची भर घालतात याचा विचार होणे आवश्यक आहे. साहित्य संमेलनाध्यक्ष हे राष्ट्रपतीपदाप्रमाणे शोभेचे पद आहे का ? याचाही विचार व्हायला हवा. घटनात्मक अधिकार नसलेल्या संमेलनाध्यक्षपदाच्या आधारे कोणताही अध्यक्ष मराठी साहित्याचा सर्वांगिण विकास करू शकत नाही. सरकारी देणगीच्या शिदोरीवर तीन दिवसांची `वाङमयीन जत्रा’ भरवून वर्षभर सभा-संमेलनात मिरविणे, मानधन घेऊन उद्घाटने करीत गावोगाव भटकणे, दूरचित्रवाणीवरून रसिकांची भेट घेणे आणि महत्वाचे म्हणजे, संमेलनाच्या समारोपप्रसंगी कधीही पूर्ण न होणारे ठराव करून सामाजिक काम केल्याचे नपुंसक समाधान मानणे इतकेच अध्यक्षाच्या हाती उरते. अध्यक्षीय भाषणांमधून आपल्या विद्वतेचे प्रदर्शन करण्यात धन्यता मानणारे अध्यक्ष साहित्य सेवेसाठी आपण कोणते कार्य हाती घेऊन ते सिध्दीस नेणार आहोत याचा खुलासा करीत नाहीत. अथवा, संकल्पित कामांचा पाठपुरावा करीत नाहीत. साहित्य महामंडळही कोणत्याही प्रकारच्या कार्यशाळा, लेखन शिबिरे, चर्चासत्रे यांचे आयोजन करताना दिसत नाहीत. साहित्यासोबतच समाजातील अपप्रवृतीच्या विरोधात उभे ठाकण्याचे काम महामंडळ किवा संमेलनाध्यक्ष करीत नाही. समाजातील ज्वलंत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी रस्त्यावर येण्याचे टाळण्याची कातडेबचाव प्रवृत्ती साहित्यिकांमध्ये बोकाळली आहे. चार भिंतीत बसून आपल्या साहित्य कृतीतून बराक ओबामापासून पंतप्रधान आणि पाकिस्तानला इशारे देणारी ही मंडळी आपल्या हक्कासाठी साध्या रिक्षाचालकाशी बोलताना वचकून असतात.
मराठी साहित्य प्रवाहात वेगवेगळे विचार, आचार, प्रवृती, इझम आहेत. तसेच, प्रस्थापित विरूध्द नवोदित असा संघर्ष पूर्वीपासूच चालत आला आहे. कलेसाठी पताका मिरविणारा आणि सामाजिक बांधिलकी मानणारा असे दोन ठळक गट असल्यामुळे या दोघांमध्ये पूर्वपरंपरागत द्वंद्व सुरू आहे. यातूनच लिटिल मॅगझिनची चळवळ, दलित साहित्य, ग्रामिण साहित्य, आदिवासी साहित्य, महिला साहित्य, विद्रोही साहित्य, ख्रिस्ती आणि मुस्लीम साहित्य निर्माण होऊन त्यांनी स्वतःची नवी ओळख निर्माण केली आहे. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाप्रमाणेच ही मंडळीही आपापल्या कुवतीप्रमाणे संमेलने भरवत असतात. तसेच, अनियतकालिके आणि मासिकांमधून आपल्या विचारांचा आणि साहित्याचे प्रचार आणि प्रसार करीत असतात. प्रत्येक साहित्यप्रेमी आपापल्या कुवतीप्रमाणे साहित्यसेवा करीत असतो.
मराठी साहित्याचा खर्या अर्थाने प्रसार करायचा असेल तर अधिक सकस साहित्यनिर्मितीसोबतच नव्या माहिती तंत्रज्ञानाचा आधार घ्यायला हवा. बदलत्या काळासोबत मराठीनेही बदलायला हवे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात नव्याने येणार्या शब्दांना पर्यायी मराठी शब्द निर्माण करून मराठी भाषा अधिक समृध्द करायला हवी. मराठी भाषेत नवे नवे ब्लॉग, मराठीची विविध संकेतस्थळे निर्माण करायला हवीत. हल्लीच्या मराठी तरूणांच्या भावविश्वाला स्पर्श करून त्यांना मराठी साहित्याकडे वळविण्याची आज खरी गरज आहे. अनिष्ठ रूढी, परंपरा, अंधश्रध्दा यांच्यावर आसूड ओढणार्या साहित्याची निर्मिती करून शास्त्रीय दृष्टीकोन मांडणारे लेखन विपुल प्रमाणात आणण्यासाठी कोणत्या उपाययोजना आखता येतील याचा विचार महामंडळ आणि साहित्य संमेलनांनी करायला हवा.
`कलेसाठी कला की, जीवनासाठी कला’ या पौराणिक वादाची अद्याप गाठ सुटली नसली तरी `जीवनासाठी अभिजात कला’जोपासता येऊ शकते, या मताचा मी आहे. तीन दिवसांच्या `साहित्य जत्रे’मुळे एकमेकांच्या भेटीगाठी होतात, नवोदितांना हुरूप येतो, पुस्तकांची विक्री होते, काही प्रमाणात मराठी साहित्याच्या भवितव्याबाबत डोळे ओले केले जातात हे मान्य असले तरी, अधिक सकस, विचारप्रवर्तक, समाजपयोगी साहित्य निर्मितीसाठी काय ठोस करता येऊ शकते यांचा गांभिर्याने विचार व्हायला हवा. अन्यथा, संत ज्ञानेश्वर जरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनले तरी मराठीचे काही भले होणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे.
No comments:
Post a Comment