एसएमएस, फोन आदींच्या माध्यमातून आयडॉल, हिरो ठरवण्याच्या स्पर्धा सध्या वाहिन्यांवर रंगल्यात. पैसा कमावण्याच्या या गोरखधंद्यात आयबीएन वाहिनीही उतरलीय. तिनं चक्क देशातल्या 50 महान व्यक्तींमध्ये महान भारतीय ठरवण्याची स्पर्धा लावलीय. एकाला दुसर्यापेक्षा कमी लेखण्याचा हा जाणीवपूर्वक सुरू असलेला प्रयत्न आहे
नक्कल आणि नकला करण्याची भारी खोड आम्हा भारतीयांना जडली आहे. नक्कल
करण्याचं
वेड प्रारंभी नाटय़ आणि चित्रपटसृष्टीत होतं, ते आता
चित्रवाहिन्यांमध्येही आलंय. `हू विल बी द मिलिनियर्स वरून `कौन बनेगा
करोडपती, `बिग ब्रदर्स वरून `बिग बॉस, `अमेरिकन आयडॉलवरून `इंडियन आयडॉल
तसंच `रोडीज, `जोर का झटका, `दस का दम आदी अनेक पाश्चात्य कार्यक्रमांची
देशी नक्कल करून माया गोळा करण्याचं सत्र हल्ली टीव्ही वर सुरू झालंय.
`द ग्रेटेस्ट ब्रिटिश या बहुचर्चित कार्यक्रमाची नक्कल करणारा `ग्रेटेस्ट इंडियन नावाचा चर्चात्मक कार्यक्रम सध्या कुतुहलाचा विषय बनलाय. `टीव्ही 18 च्या `आयबीएन वृत्तसमूहातील सीएनएन-आयबीएन, आयबीएन-लोकमत आणि `हिस्ट्री चॅनल्सवर महात्मा गांधी यांच्यानंतरचा महान भारतीय कोण? हे ठरविण्यासाठी पॅनल चर्चा, एसएमएस आणि मिस्ड कॉलद्वारे मोहीम हाती घेण्यात आलीय. यासाठी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील सुमारे 50 नामवंतांची निवड करण्यात आलीय. या 50 नामवंतांमधील एकाची `जनतेच्या मताद्वारे येत्या 15 ऑगस्टला `महान भारतीय म्हणून निवड जाहीर करण्यात येणार आहे.
पत्रकार राजदीप सरदेसाई, निखिल वागळे, शोभा डे, करण थापर, हर्षा भोगले आदी 28 जणांच्या पॅनलनं या 50 नामवंतांची निवड केली असून महात्मा गांधींना स्पर्धेपूर्वीच पहिला क्रमांक देऊन टाकलाय. समस्त महिला वर्ग, दलित आणि मुस्लीम समाजाचं कल्याण तसंच स्वातंत्र्य लढय़ातल्या अनेक निर्णयांबाबत गांधीजी नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. प्रारंभी हिंदुत्व आणि मनुवादी विचारांचा पुरस्कार करणारे गांधीजी यांना स्पर्धेपूर्वीच पहिल्या क्रमांकाचे मानकरी म्हणून घोषित करणार्या निवड समितीनं कोणता निकष लावला, हे कळायला मार्ग नाही.
या 50 नामवंतांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, मदर तेरेसा, धिरूभाई अंबानी, इंदिरा गांधी, जनरल मानेकशा, सुब्बालक्ष्मी, रामगोपालचारी, पंडित जवाहरलाल नेहरू, बाबा आमटे, कांशिराम, लता मंगेशकर, दिलीप कुमार, देवआनंद, किशोर कुमार, राजकपूर, ए. आर. रेहमान, सत्यजित रे, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, वल्लभभाई पटेल, अमिताभ बच्चन, बिर्ला, गोयंका, विनोबा भावे आदी मंडळींचा समावेश करण्यात आलेला आहे.
महात्मा गांधी यांच्यानंतरचा महान भारतीय कोण? या मतचाचणीसाठी 28 जणांच्या ज्युरींचं एक पॅनल तयार करण्यात आलंय. या राष्ट्रव्यापी मतचाचणीप्रमाणेच ज्युरींची निवड आणि नेल्सन कंपनीकडून करण्यात येणार्या स्वतंत्र संशोधन चाचणीद्वारे मतांचं मूल्यांकन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून `सर्वश्रेष्ठ दहा जणांची यादी प्रारंभी तयार करण्यात येईल. त्यानंतर मतचाचणीच्या दुसर्या टप्प्यात या दहा नामवंतांपैकी एकाची `महान भारतीय म्हणून निवड जाहीर करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारतावर प्रभाव पाडणार्या विविध क्षेत्रातील 50 प्रतिभावंतांची यादी जाहीर करण्यात आली असून, राजकारण, समाजकारण, क्रीडा, उद्योग, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील निवडक मान्यवरांना या यादीत स्थान देण्यात आले आहे.
`राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना मात्र मतचाचणीच्या संपूर्ण प्रक्रियेतून वगळून त्यांना स्पर्धेआधीच `महान भारतीय म्हणून प्रमाणपत्र बहाल करण्यात आलंय. स्वातंत्र्य लढय़ातलं गांधीजींचं योगदान काहीसं वादग्रस्त असलं तरी राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत मात्र त्यांचं फारसं योगदान नव्हतं. असं असतानाही त्यांना प्रथम क्रमांक जाहीर करून राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं श्रेष्ठत्व मात्र मतदानाद्वारे ठरविण्याचा घाट घालण्यात आलाय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पददलित, अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण उद्धारासोबतच समस्त महिला वर्ग आणि कामगारांसाठी केलेलं योगदान सर्वश्रुत आहे. शिवाय बाबासाहेबांनी राज्यघटनेची निर्मिती करून राष्ट्रनिर्मितीसाठी जे कार्य केलंय, त्याला इतिहासात तोड नाही. त्या महापुरुषाचं नाव या यादीत घालून त्यांचं श्रेष्ठत्व कमी करण्याचाच हा प्रकार असल्याचं यानिमित्तानं स्पष्ट होतंय. कारण मतचाचणीद्वारे डॉ. आंबेडकर हे प्रथम क्रमांकाने `महान भारतीय जरी ठरले तरी ते महात्मा गांधींपेक्षा कमी होते, हे समाजमनावर बिंबविण्याची ही हिणकस खेळी आहे. कारण महात्मा गांधींनंतर महान भारतीय कोण? असं शीर्षक देऊन 28 जणांच्या तथाकथित विचारवंतांनी गांधीजींना हेतूपुरस्सर `सर्वश्रेष्ठ महान भारतीय म्हणून घोषित करून टाकलंय.
या महनीय नामवंतांचा कार्यकाळ आणि कार्यक्षेत्र भिन्न आहे. त्या त्या काळात आणि त्या त्या क्षेत्रात या नामवंतांनी आपला ऐतिहासिक ठसा उमटवलाय. यातील बहुसंख्य नामवंत वादग्रस्त ठरल्याची उदाहरणं आहेत. परंतु त्यांनी आपापल्या काळात आणि क्षेत्रात केलेलं योगदान कुणालाही पूर्णपणे नाकारता येणार नाही. इतिहासच माणूस घडवीत असतो. इतिहासाची अपरिहार्यता म्हणून असामान्य माणसं घडतात. यापुढंही भविष्यात अशा प्रकारची महान व्यक्तिमत्त्वं निर्माण होतील यात वाद नाही. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान होते की अमिताभ बच्चन हा प्रश्न जसा निर्माणच होऊ शकत नाही, तसाच सत्यजित रे महान होते की धिरूभाई अंबानी हा प्रश्नही उद्भवू शकत नाही. मान्य आहे की, डॉ. आंबेडकरांना तेंडुलकरसारखी बॅटिंग करता येणार नाही किंवा मदर तेरेसांना ए. आर. रेहमानसारखं संगीत देता येऊ शकणार नाही. म्हणून काय त्यांच्यात स्पर्धा होऊ शकते? अशाप्रकारची हास्यास्पद स्पर्धा आयोजित करून सवंग प्रसिद्धी आणि अमाप पैसा कमावण्याचा उद्योग सुरू असल्याचा संशय बळावतो.
शांततेसाठी दिल्या जाणार्या पुरस्कारासाठी महात्मा गांधी यांच्या नावाची तब्बल सातवेळा शिफारस झाली. पण त्यांना नोबेल पुरस्कार नाकारण्यात आला. हा इतिहास आहे. जागतिक पातळीवर गांधीजींची धूसर असलेली प्रतिमा अधिक उज्ज्वल करण्याचाच हा डाव तर नाही ना अशीही शंका मनात चमकून जाते.
ब्रिटनमध्ये `इक्वॅलिटी बिलाद्वारे जातीयवाद हा वंशवादाचाच प्रकार आहे असं संसदेनं मान्य केल्यानंतर तिथल्या भारतीय वंशांच्या काही मंडळींनी या विधेयकाला विरोध केला होता. गांधीजी अस्पृश्यता आणि जातीव्यवस्था, वंशवाद मानणारे नव्हते. हा भारतीय वंशाच्या मंडळींचा मुद्दा ब्रिटिश सरकारनं खोडून काढला होता. आफ्रिकेतील काळ्या कैद्यांसोबत आपल्याला ठेवण्यात येऊ नये अशी याचना करणारं पत्र गांधीजींनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला पाठवलं होतं. या इतिहासाची या ठिकाणी आठवण होते. सरदेसाई, वागळे, डे ही मंडळी हा इतिहास सोईस्करपणे विसरले असावेत असे वाटते.
गांधीजींना आपण `राष्ट्रपिता मानतो. `मुक्तीदाता नव्हे! डॉ. आंबेडकरांना मात्र भारतातीलच नव्हे तर जगभरातील उपेक्षित, पददलित मानवसमूह मार्गदाता आणि मुक्तीदाता मानतो! हे सत्य कोणी नाकारू शकेल का? महिला आणि कामगार यांच्या उद्धारासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या अपूर्व कामगिरीची नोंद इतिहासानं घेतलेली आहे. त्यामुळं बाबासाहेबांच्या मोठेपणाचं मूल्यमापन नेहरू, पटेल, तेंडुलकर, लता मंगेशकर, बिर्ला, गोयंका, कांशिराम यांच्या पंगतीला बसवून करता येऊ शकते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
विनोदाची बाब अशी की, यादीत बहुजन समाज पक्षाचे विचारवंत कांशिराम यांचेही नाव आहे. कांशिराम यांचं सामाजिक योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. असं असलं तरी पेरूस्वामींऐवजी त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलंय. डॉ. आंबेडकर आणि कांशिराम यांच्यात निवड करताना पर्याय शोधावा लागणार नाही. कांशिराम स्वतः हयात असते तर त्यांनीही आपले मत बाबासाहेबांच्याच पारडय़ात टाकलं असतं. हा प्रचंड मोठ विनोद असला तरी विचार करायला लावणारी बाब आहे. 50 जणांच्या यादीतून सावरकरांना का वगळण्यात आले हाही संशोधनाचा विषय आहे.
दूरचित्रवाहिन्यांवर फोन किंवा एस.एम.एस. करून `इंडियन आयडॉल, `बिग बॉस ठरविण्याचा किंवा `कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागाची लॉटरी लावण्याचे प्रकार नेहमीच केले जातात. `गोल्ड फिशसारख्या कार्यक्रमात स्त्री-पुरुषांचे अर्धे-अर्धे छायाचित्र कापून एक वेगळा चेहरा बनविण्याचा आणि ते ओळखण्याचा जुगार चाललेला असतो. हा केवळ प्रेक्षकांना मूर्ख बनविण्याचा आणि आपला खिसा भरण्याचाच प्रकार आहे. अगदी तशीच गत `ग्रेटेस्ट इंडियनची झाली आहे. नाही का?
आपल्या देशातील जाणकार, सामाजिक भान असलेल्या आणि सद्सद्विवेक शाबूत ठेवणार्या मंडळींनी या षडयंत्राला बळी पडून एस.एम.एस. अथवा मिस्ड कॉलच्या भानगडीत पडू नये. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक नव्हे तर अनेक `महान भारतीय वस्ती करून आहेत. त्यांनी त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध केलेलं आहे. त्यांच्या कार्याची, विचारांची कारणमीमांसा जरूर व्हावी. परंतु त्यांच्यात श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाची पोकळ स्पर्धा लावणं इतिहासालाही आवडणार नाही.
एस.एम.एस.द्वारे श्रेष्ठत्व किंवा लोकप्रियता सिद्ध करावयाचे ठरल्यास कोणीही संवंग लोकप्रियता मिळवणारे नट-नटय़ा, गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकारणी `महान भारतीय ठरू शकतात. म्हणून आपण गया प्रकारच्या कुटील कारस्थानात सहभागी न होता त्याविरुद्ध आवाज उठवायला हवा. समाजप्रबोधन करून समाजात दुही माजविणार्या प्रवृत्तींची वेळीच नांगी ठेचून काढायला हवी. महान व्यक्तींचे मूल्यमापन त्यांच्या विचारांवर, कर्तृत्वावर व्हायला हवे. मतचाचणीद्वारे नव्हे!
भगवान निळे
`द ग्रेटेस्ट ब्रिटिश या बहुचर्चित कार्यक्रमाची नक्कल करणारा `ग्रेटेस्ट इंडियन नावाचा चर्चात्मक कार्यक्रम सध्या कुतुहलाचा विषय बनलाय. `टीव्ही 18 च्या `आयबीएन वृत्तसमूहातील सीएनएन-आयबीएन, आयबीएन-लोकमत आणि `हिस्ट्री चॅनल्सवर महात्मा गांधी यांच्यानंतरचा महान भारतीय कोण? हे ठरविण्यासाठी पॅनल चर्चा, एसएमएस आणि मिस्ड कॉलद्वारे मोहीम हाती घेण्यात आलीय. यासाठी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील सुमारे 50 नामवंतांची निवड करण्यात आलीय. या 50 नामवंतांमधील एकाची `जनतेच्या मताद्वारे येत्या 15 ऑगस्टला `महान भारतीय म्हणून निवड जाहीर करण्यात येणार आहे.
पत्रकार राजदीप सरदेसाई, निखिल वागळे, शोभा डे, करण थापर, हर्षा भोगले आदी 28 जणांच्या पॅनलनं या 50 नामवंतांची निवड केली असून महात्मा गांधींना स्पर्धेपूर्वीच पहिला क्रमांक देऊन टाकलाय. समस्त महिला वर्ग, दलित आणि मुस्लीम समाजाचं कल्याण तसंच स्वातंत्र्य लढय़ातल्या अनेक निर्णयांबाबत गांधीजी नेहमीच वादग्रस्त राहिले आहेत. प्रारंभी हिंदुत्व आणि मनुवादी विचारांचा पुरस्कार करणारे गांधीजी यांना स्पर्धेपूर्वीच पहिल्या क्रमांकाचे मानकरी म्हणून घोषित करणार्या निवड समितीनं कोणता निकष लावला, हे कळायला मार्ग नाही.
या 50 नामवंतांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, मदर तेरेसा, धिरूभाई अंबानी, इंदिरा गांधी, जनरल मानेकशा, सुब्बालक्ष्मी, रामगोपालचारी, पंडित जवाहरलाल नेहरू, बाबा आमटे, कांशिराम, लता मंगेशकर, दिलीप कुमार, देवआनंद, किशोर कुमार, राजकपूर, ए. आर. रेहमान, सत्यजित रे, सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, वल्लभभाई पटेल, अमिताभ बच्चन, बिर्ला, गोयंका, विनोबा भावे आदी मंडळींचा समावेश करण्यात आलेला आहे.
महात्मा गांधी यांच्यानंतरचा महान भारतीय कोण? या मतचाचणीसाठी 28 जणांच्या ज्युरींचं एक पॅनल तयार करण्यात आलंय. या राष्ट्रव्यापी मतचाचणीप्रमाणेच ज्युरींची निवड आणि नेल्सन कंपनीकडून करण्यात येणार्या स्वतंत्र संशोधन चाचणीद्वारे मतांचं मूल्यांकन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेतून `सर्वश्रेष्ठ दहा जणांची यादी प्रारंभी तयार करण्यात येईल. त्यानंतर मतचाचणीच्या दुसर्या टप्प्यात या दहा नामवंतांपैकी एकाची `महान भारतीय म्हणून निवड जाहीर करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात भारतावर प्रभाव पाडणार्या विविध क्षेत्रातील 50 प्रतिभावंतांची यादी जाहीर करण्यात आली असून, राजकारण, समाजकारण, क्रीडा, उद्योग, चित्रपट आणि साहित्य क्षेत्रातील निवडक मान्यवरांना या यादीत स्थान देण्यात आले आहे.
`राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना मात्र मतचाचणीच्या संपूर्ण प्रक्रियेतून वगळून त्यांना स्पर्धेआधीच `महान भारतीय म्हणून प्रमाणपत्र बहाल करण्यात आलंय. स्वातंत्र्य लढय़ातलं गांधीजींचं योगदान काहीसं वादग्रस्त असलं तरी राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत मात्र त्यांचं फारसं योगदान नव्हतं. असं असतानाही त्यांना प्रथम क्रमांक जाहीर करून राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं श्रेष्ठत्व मात्र मतदानाद्वारे ठरविण्याचा घाट घालण्यात आलाय.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पददलित, अल्पसंख्यांक समाजाच्या सर्वांगीण उद्धारासोबतच समस्त महिला वर्ग आणि कामगारांसाठी केलेलं योगदान सर्वश्रुत आहे. शिवाय बाबासाहेबांनी राज्यघटनेची निर्मिती करून राष्ट्रनिर्मितीसाठी जे कार्य केलंय, त्याला इतिहासात तोड नाही. त्या महापुरुषाचं नाव या यादीत घालून त्यांचं श्रेष्ठत्व कमी करण्याचाच हा प्रकार असल्याचं यानिमित्तानं स्पष्ट होतंय. कारण मतचाचणीद्वारे डॉ. आंबेडकर हे प्रथम क्रमांकाने `महान भारतीय जरी ठरले तरी ते महात्मा गांधींपेक्षा कमी होते, हे समाजमनावर बिंबविण्याची ही हिणकस खेळी आहे. कारण महात्मा गांधींनंतर महान भारतीय कोण? असं शीर्षक देऊन 28 जणांच्या तथाकथित विचारवंतांनी गांधीजींना हेतूपुरस्सर `सर्वश्रेष्ठ महान भारतीय म्हणून घोषित करून टाकलंय.
या महनीय नामवंतांचा कार्यकाळ आणि कार्यक्षेत्र भिन्न आहे. त्या त्या काळात आणि त्या त्या क्षेत्रात या नामवंतांनी आपला ऐतिहासिक ठसा उमटवलाय. यातील बहुसंख्य नामवंत वादग्रस्त ठरल्याची उदाहरणं आहेत. परंतु त्यांनी आपापल्या काळात आणि क्षेत्रात केलेलं योगदान कुणालाही पूर्णपणे नाकारता येणार नाही. इतिहासच माणूस घडवीत असतो. इतिहासाची अपरिहार्यता म्हणून असामान्य माणसं घडतात. यापुढंही भविष्यात अशा प्रकारची महान व्यक्तिमत्त्वं निर्माण होतील यात वाद नाही. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर महान होते की अमिताभ बच्चन हा प्रश्न जसा निर्माणच होऊ शकत नाही, तसाच सत्यजित रे महान होते की धिरूभाई अंबानी हा प्रश्नही उद्भवू शकत नाही. मान्य आहे की, डॉ. आंबेडकरांना तेंडुलकरसारखी बॅटिंग करता येणार नाही किंवा मदर तेरेसांना ए. आर. रेहमानसारखं संगीत देता येऊ शकणार नाही. म्हणून काय त्यांच्यात स्पर्धा होऊ शकते? अशाप्रकारची हास्यास्पद स्पर्धा आयोजित करून सवंग प्रसिद्धी आणि अमाप पैसा कमावण्याचा उद्योग सुरू असल्याचा संशय बळावतो.
शांततेसाठी दिल्या जाणार्या पुरस्कारासाठी महात्मा गांधी यांच्या नावाची तब्बल सातवेळा शिफारस झाली. पण त्यांना नोबेल पुरस्कार नाकारण्यात आला. हा इतिहास आहे. जागतिक पातळीवर गांधीजींची धूसर असलेली प्रतिमा अधिक उज्ज्वल करण्याचाच हा डाव तर नाही ना अशीही शंका मनात चमकून जाते.
ब्रिटनमध्ये `इक्वॅलिटी बिलाद्वारे जातीयवाद हा वंशवादाचाच प्रकार आहे असं संसदेनं मान्य केल्यानंतर तिथल्या भारतीय वंशांच्या काही मंडळींनी या विधेयकाला विरोध केला होता. गांधीजी अस्पृश्यता आणि जातीव्यवस्था, वंशवाद मानणारे नव्हते. हा भारतीय वंशाच्या मंडळींचा मुद्दा ब्रिटिश सरकारनं खोडून काढला होता. आफ्रिकेतील काळ्या कैद्यांसोबत आपल्याला ठेवण्यात येऊ नये अशी याचना करणारं पत्र गांधीजींनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला पाठवलं होतं. या इतिहासाची या ठिकाणी आठवण होते. सरदेसाई, वागळे, डे ही मंडळी हा इतिहास सोईस्करपणे विसरले असावेत असे वाटते.
गांधीजींना आपण `राष्ट्रपिता मानतो. `मुक्तीदाता नव्हे! डॉ. आंबेडकरांना मात्र भारतातीलच नव्हे तर जगभरातील उपेक्षित, पददलित मानवसमूह मार्गदाता आणि मुक्तीदाता मानतो! हे सत्य कोणी नाकारू शकेल का? महिला आणि कामगार यांच्या उद्धारासाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी बाबासाहेबांनी केलेल्या अपूर्व कामगिरीची नोंद इतिहासानं घेतलेली आहे. त्यामुळं बाबासाहेबांच्या मोठेपणाचं मूल्यमापन नेहरू, पटेल, तेंडुलकर, लता मंगेशकर, बिर्ला, गोयंका, कांशिराम यांच्या पंगतीला बसवून करता येऊ शकते का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
विनोदाची बाब अशी की, यादीत बहुजन समाज पक्षाचे विचारवंत कांशिराम यांचेही नाव आहे. कांशिराम यांचं सामाजिक योगदान कुणालाही नाकारता येणार नाही. असं असलं तरी पेरूस्वामींऐवजी त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलंय. डॉ. आंबेडकर आणि कांशिराम यांच्यात निवड करताना पर्याय शोधावा लागणार नाही. कांशिराम स्वतः हयात असते तर त्यांनीही आपले मत बाबासाहेबांच्याच पारडय़ात टाकलं असतं. हा प्रचंड मोठ विनोद असला तरी विचार करायला लावणारी बाब आहे. 50 जणांच्या यादीतून सावरकरांना का वगळण्यात आले हाही संशोधनाचा विषय आहे.
दूरचित्रवाहिन्यांवर फोन किंवा एस.एम.एस. करून `इंडियन आयडॉल, `बिग बॉस ठरविण्याचा किंवा `कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागाची लॉटरी लावण्याचे प्रकार नेहमीच केले जातात. `गोल्ड फिशसारख्या कार्यक्रमात स्त्री-पुरुषांचे अर्धे-अर्धे छायाचित्र कापून एक वेगळा चेहरा बनविण्याचा आणि ते ओळखण्याचा जुगार चाललेला असतो. हा केवळ प्रेक्षकांना मूर्ख बनविण्याचा आणि आपला खिसा भरण्याचाच प्रकार आहे. अगदी तशीच गत `ग्रेटेस्ट इंडियनची झाली आहे. नाही का?
आपल्या देशातील जाणकार, सामाजिक भान असलेल्या आणि सद्सद्विवेक शाबूत ठेवणार्या मंडळींनी या षडयंत्राला बळी पडून एस.एम.एस. अथवा मिस्ड कॉलच्या भानगडीत पडू नये. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक नव्हे तर अनेक `महान भारतीय वस्ती करून आहेत. त्यांनी त्यांचं श्रेष्ठत्व सिद्ध केलेलं आहे. त्यांच्या कार्याची, विचारांची कारणमीमांसा जरूर व्हावी. परंतु त्यांच्यात श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्वाची पोकळ स्पर्धा लावणं इतिहासालाही आवडणार नाही.
एस.एम.एस.द्वारे श्रेष्ठत्व किंवा लोकप्रियता सिद्ध करावयाचे ठरल्यास कोणीही संवंग लोकप्रियता मिळवणारे नट-नटय़ा, गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकारणी `महान भारतीय ठरू शकतात. म्हणून आपण गया प्रकारच्या कुटील कारस्थानात सहभागी न होता त्याविरुद्ध आवाज उठवायला हवा. समाजप्रबोधन करून समाजात दुही माजविणार्या प्रवृत्तींची वेळीच नांगी ठेचून काढायला हवी. महान व्यक्तींचे मूल्यमापन त्यांच्या विचारांवर, कर्तृत्वावर व्हायला हवे. मतचाचणीद्वारे नव्हे!
भगवान निळे
No comments:
Post a Comment