Friday, June 28, 2013

लैंगिक केंडी करून अत्याचार कसे थांबणार?


दिल्ली बलात्काराच्या घटनेनंतर मुंबई पोलिस अधिक सतर्क झाले असून बलात्कार करणर्या व महिलांचे लैंगिक शोषण करणार्या समाजकंटकां अटकाव करण्याऐवजी प्रेम करण्याच्या प्रेमी युगलांविरूध्दच त्यांनी शिस्तीचा बडगा उगारला आहे. मुंबई शहरामध्ये गिरगाव, वरळी, मरीन ड्राइव्ह, बांद्रा बॅण्ड स्टॅण्ड, जूहू चौपाटी आणि इतर ठिकाणी समुद्राच्या कडेला असलेल्या पर्यटनस्थळी प्रेमी युगुले समुद्रामध्ये भरती नसेल तेव्हा खोलवर समुद्राच्या आतमध्ये खडकावर एकांतात व निर्मनुष्य ठिकाणी जाऊन प्रेम करतात. एकांत आणि निर्मनुष्य ठिकाणी असणारी अशी जोडपी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या नजरेस पडल्यास त्यांच्याकडून त्या जोडप्यांना धाक दाखवून लुटमार करून सदर मुलीवर लैंगिक अत्याचारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही प्रसंगी त्यांची हत्याही होऊ शकते. अशा एकांत आणि निर्मनुष्य ठिकाणी फिरणा-या जोडप्यांना तेथून हटकवून वेळेप्रसंगी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे, असे पोलिसांना वाटते. पोलिसांच्या या `तालीबानी’ आदेशाचा बहुतांश तरूण – तरूणींनी निषेध केला आहे. लैंगिक कोंडी केल्याने बलात्काराचा आणि लैंगिक शोषणाचा प्रश्न सुटू शकतो का असा सवाल अनेकांनी केला आहे.
लैंगिक भुकेसंदर्भात निसर्गाने केलेली योजना आणि समाज आणि पोलिसांनी घालून घेतलेली शरीरसंबंधाची बंधने, यामुळे स्त्री-पुरुषांच्या लैंगिक गरजेचा निचरा न होता कोंडीच अधिक होते. शारीरिक संबध आणि पेमभावनेवर कायद्याची बंधने घातली तर त्याचे विपरित परिणाम होऊन बलात्कार आणि लैंगिक शोषणात प्रचंड वाढ होईल, असे काही जणांना वाटते.
वैद्यकीय व्यवसायातील एका तरूणीचे म्हणणे असे की, निसर्गाने सजीवांच्या जगण्यासाठी अन्नाची भूक आणि लैंगिक भूक अत्यावश्य केली आहे. जगण्यासाठी आणि संपूर्ण प्राणिजात टिकून राहण्यासाठी अन्नाची आणि लैंगिक भूक अशी निसर्गाची व्यवस्था आहे. या दोन्ही भुका ‘पेरिफेरल नव्हर्स सिस्टीम’ आणि ‘सेंट्रल नव्हर्स सिस्टीम’ यांच्या दरम्यान होणार्या संदेश-आदेशाच्या परिवहनातून परस्पर सहकार्याने विशिष्ट हार्मोन्स निर्मितीद्वारे निर्माण केल्या जातात आणि त्यानुसार प्राणिजातीला पवित्रे घेण्यास भाग पाडले जाऊन शमविल्या जातात. त्याकरिता मेंदुत, या दोन भुकांचा ‘प्रीवायिरग सेटअप’ उत्क्रांतीमधून नक्की झालेला असतो; त्यामुळे त्या कोणत्याही प्राण्यांच्या ऐच्छिक नियंत्रणाखाली नसतात. शिवाय या दोन भुकांअभावी सजीव प्राणी विनाशाकडे जातात. मात्र विनाशाप्रती संघर्ष करण्याच्या सजीवांच्या आंतरिक गुणधर्मातून या भुका शमविण्याचा प्रयत्न सर्व प्राणी करतात. बुद्धिमान मनुष्यप्राणी तर हा प्रयत्न आटोकाट करतो. अन्नाच्या भुकेसाठी चोरी, मारामारी आणि लैंगिक भुकेसाठी जबरदस्तीच्या संबंधाची गुन्हेगारी केली जाते.
विनयभंग, बलात्कार, मुलींची छेडछाड यांसारख्या गुन्ह्गयांवर होणार्या चर्चा आणि प्रतिक्रियांमधून कायदे कडक होणे वा त्याची कठोर अंमलबजावणी, पोलीस संरक्षण वाढविणे, पुरुषांची मानसिकता बदलणे अशा सूचना पुढे आणल्या जातात,पण पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी या विषयांवर कधीच कुणी चर्चा करीत नाही. स्त्री-पुरुष निष्ठेच्या संबंधावर समाज उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. मानवीजीवनात महिलेला मूल होण्याचे शरीरनियम निसर्गाचे, परंतु शरीरसंबंधाचे नियम मात्र माणसांनी केले आहेत. यामुळे मानवीमनात आणि शरीरात जो एक आंतर्विरोध निर्माण झालेला आहे, त्याला सामोरे जाताना, त्याचा तात्काळ परिणाम हा समाजातील लैंगिक गुन्हेगारीत परावर्तित होतों. कारण शरीरसंबंधावर मेंदू आणि हार्मोन्सच्या नैसर्गिक कार्यात हस्तक्षेप केल्यासारखे होते. ज्याचे परिणाम निव्वळ लैंगिकतेपुरते मर्यादित न राहता, ते स्त्री-पुरुषांमध्ये मानसिक अशांती, अस्वस्थता, प्रक्षोभ, विकृती अशा पद्धतीने दृश्य होऊ लागतात.असे काही तरूणांचे मत आहे.
पोलिसांनी समाजकंटक, गुन्हेगार यांना वचक दाखविण्यासाठी कायद्याचा बडगा उभारून सर्वसामान्य माणूस कसा सुरक्षित होईल याकडे अधिक लक्ष द्यावे. प्रेमावर बंधने घालण्याऐगची प्रेमभाव कसा निर्माण होईल याकडे अधिक लक्ष देळन तत्परता दाखवावी. बिचार्या प्रेमीयुगलांच्या मागे लागू नये. प्रेमीयुगलांना प्रेम करण्यासाठी मुंबईत मोकळी, एकांत जागा शिल्लक राहिलेली नाही. चौपाटय़ांवर, अथवा उज्ञानावरूनही त्यांना हुसकावून लावले तर त्यांनी जायचे कुठे? असा सवाल अनेकांनी केला.
भगवान निळे

No comments:

Post a Comment