Friday, October 18, 2013

स्वप्ननगरीच्या स्वप्नपरीपुढे एका फकीराची कैफियत


जिने अद्याप आपल्या चाकोरीबध्द नगरीची वेस
ओलांडली नाही ती तू
स्वप्नांच्या साम्राज्यात भटकणारी एक स्वप्नपरी
या कंगाल फकीराच वाडग्यात
काय डोकावून पाहतेस?
येथे जळून गेलेल्या ऋृतूंशिवाय
नि, करपलेल्या मोहराशिवाय
तुला काहीही दिसणार नाही यावर विश्‍वास ठेव !
ज्यांच्याजवळ पिढीजात वेदना. अन्
नशिबालाच दोष देण्याव्यतिरिक्त
स्वत:च्या मालकीचं असं काहीच नसतं
त्यांनी डोळयानची कवाडं बंद केली तरी
थांबत नाहीत त्यांच्या मेन्दुतील थैमान
अन्
ज्यांचे हात झिजता झिजता
मनगटंही ठिसूळ होत जातात कालांतरानं
त्यांच्याजवळ बोडकं आभाळ नि, उजाड माळरान
याखेरीज असा कोणता खजिना असणाराहे गुप्त गुहेत ?
असा कोणता द्रव पाझरत चालला
त्यांच्या शरीररातून की,
आकार घेन्याआधीच त्यांचा चेहरा ओरबडला जातो
या नगरीच्या गल्लीबोळातून चेहरा दडविताना
याचा शोध घेणाराहेस का तू?

अगं,
इथला हरेक माणूस
आपलं दारिद्रही झाकून ठेवतो इतरांच्या डोळंयापासून
सावधतेनं. हुशारीनं. नि,
आपल दु:खांनाच चक्क ‘हॅलो’ करून
हातमीळवणी करतो दु:खाशी.
जो चहा पील्यानंतर
पैसे देन्याचे मनात नसतानाही
उगीचच खिशात हात घालून
आपल्या दोस्तांपुढं सभ्पणाचं नाटक करतो
अन् जो,
आपला बाप अनवानी पायानं
या शहराच्या उकळत्या रस्तंयावरून फीरताना
आपल प्रतिष्ठित मीत्रांना कळू नये म्हणून
सोईस्करपणे आपल्या बापाचीच ओळख टाळतो
त्याच्या वेदनेचा देठ तू पकडला आहेस का?

हे स्वप्नपरे,
सकाळच्या भूपाळीनं
अथवा, गुलाम अलींच गझलांनी
झोपेतून उठणारी तू
टाईमपास म्हणून मोरांची पिसं रंगविताना
कधी पोट्रेट केलं आहेस का
कुंडीत अन्न शोधणार्या निरागस पोरांचं भवितव्या ?
ज्याचं दु:ख मोजता येणार नाही फुटपट्टीनं
त्या वेशीबाहेरील जगाचे रंगरूप
तू न्याहाळले आहेस का डोळे भरून ?
तू थोपवू शकतेस का
करूणेचे महासागर हृदयात
नि, त्यांच्या लढ्यात
तूही टाकू शकतेस का बरोबरीनं पाऊल
एक कॉम्रेड होऊन?
तप्पूर्वी,
हे स्वप्नगरीच्या स्वप्नपरे,
या फकीराच्या साम्राज्यात
बंदिस्त गुलाम नि, बेड्यांविरूध्दचा त्यांचा दिनरात संघर्ष
याखेरीज तुझ्या पदरात काहीही पडणार नाही
हे लक्षात असू दे!!

आरशाच्या काही कविता



एकजात सर्वच माण्सं
आपापल्या परीनं खेाटं बोलत असतात.
आरसा बोलत नाही
असं असतानाही
पगाराच दिवशी माझा चेहरा
आरशात पडलेलाच दिसतो.



माण्सांचे चेहरे हरविलेले असतात
की,
माण्सं आपला चेहरा चार भिंतीत कोंडून
बिन चेहरनं वावरत असतात या गर्दीत ?
हा प्रश्न पडलवर मी
स्वत:चा चेहरा शोधण्याचा प्रयत्न करतो
तर
आरशानेच आपला चेहरा गमावलेला असतो !



दु:खाशी हितगूज कराला
आरसा खूपच उपायोगी पडतो
आपण रडलो तर तोही रडतो
उदास झाल्यावर उदास होतो
पण गंध उडाल्यावर बिचारा आरसा
आपल्या दु:खाशी हितगूज कराला कुणाकडे जातो?



आरसा कधीच स्वतंत्र नसतो
त्याला जखडून ठेवणत येते
लाकडाच अथवा पत्रच चौकटीत
म्हणून तर तो ’ाझा चेहरा
बंदिस्त करून ठेवत नसेल ना?



उंबरठ्याबाहेर पडताना तू
सफाईदारपणे पदर सावरतेस
पुरूषांसारखी मांडी घालून तू
जेवायला कधी बसत नाहीस
भर माणसात हसायला आलवर
हसू दाबून दाताखाली पदर धरतेस
नवरने मारझोड केलवर
नशिबाला दोष देत त्याला शरीर देतेस
आरशासमोर मात्र तू खूपच बिनधास्त असतेस
हो ना?



प्रत्येकाच्याच खोबणीत
बुबुळाएैवजी बसविलेल्या असतात आरशांच्या काचा
घोषणा देणार मोर्चाकडं कानाडोळा करन्यासाठी.
असं मी म्हणताच
तिने चक्क डोळे मीटून घेतले.



आरशांच्या क्षेत्रफळानुसार
बदलत जातात माणसांचे आकार
लांबी/रुंदी/उंची/
आमच्या वस्तीत मात्र
कुणाजवळच मोठ्या आकाराचे आरसे नाहीत
नि, आरशात मावणारे चेहरेही.



उखळात डोके ठेवलवर
मुसळाची भीती बाळगाची नसते
हे मला आरशानेच शिकविले
जवेळी मी त्यात स्वत:ला पाहून घेतले.



स्वत:ला सावरता सावरता
आपण नकळत किती ढासळत जातो
या तटबंदी शहरात
आरसा मात्र भिंतीवर टिच्चून लटकलेला असतो.
- हे पाहून मी खळकन् फुटतो....



बिलोरी काचांच्या या दुनिेत
मी अजूनही
प्रत्येकासमोर आरसा धरतो.

तलवारीच्या पात्यावरील फुलपाखरू



माझ्या कवितेतील संदर्भ शोधताना
तिची दमछाक होते
नि, स्वत:ला सावरता सावरता
तिच्या कल्पनेच्या भिंती ढासळत जातात आपसूक.
कवितेमधील हरेक शब्दाच्या विळख्यातून
बाहेर पडन्याचा ती प्रयत्न करते
अन्,
त्यात स्वत:ला अधिकच गुरफटून घेते.
माझी कविता
कधीच हिरमुसून जात नाही
तिच्या जिवाच्या आट्यापिट्यानं
उलट
कवितेच्या ओळीओळीला
तलवारीच्या पात्याचं रूप येत जातं.
अशावेळी ती मला
तलवारीच्या पात्यावर
थरथरणार फुलपाखरासारखी दिसते.

माझ्या कवितेतून
मी मोजू शकतो
तिच्या तकलादू जगाच्या मर्यादित सीमारेषा
नि, समजू शकतो
तिच्या आदिम संकल्पना.
मी पाहतो
तिच्या मे न्दुची होत चाललेली वाताहत
नि, अनुभवू शकतो
चार भिंतींच्या आतील तिची घुसमट
ज्याविरूध्द
माझी कविता बोलते.
तिच्या ठसठसणार्या जखमेवर बोट ठेवते
तिला माणसांच्या चेहर्याची ओळख करून देते
तिला नव्या जगाचं
नवं तत्वज्ञान सांगते.

तलवारीच्या पात्याची
आता तिला सवय झाल्याचं एैकतोय!

शहराचे मालक आपणच असतो



प्रत्येक अनिकेत संध्याकाळी
चतकोर कागदावर सारं शहर रेखाटून
आपण चालू लागतो
शहर खिशात कोंबून
शहराच्या त्वचेवर पावलांचे ठसे कोरीत.
त्यावेळी या शहरातील
मृत्युच्या भयाण आवाजाचे प्रतिध्वनी
आपल्या काळजावर न उमटताच
विरघळून जातात आसमंतात .
मग आपण
या शहराचे भवितव्य आखीत
उभारत जातो इप्सित नवं कोरं शहर
आभाळभर.
शहराचे आराखडे पूर्ण करीत करीतच
आपण येतो फेसाळणार समुद्रापर्यंत नकळत
नि,
भिरकावून देतो शब्दांच्या पलिकडलं दु:ख
खिशात चुरगळलेल्या शहराच्या चेहज्यानिशी
आत्महत्या करणार्या तरूणीसारखं
खवळलेल लाटांमध्ये
अन्
छातीत समुद्र घेऊन परततो आपण
आपापल्या चार भिंतींच्या जगात.

प्रत्येक रात्री शहराचे मालक आपणच असतो....

Thursday, September 19, 2013

बायको पुन्हा मला...

बायको पुन्हा मला नवी वाटू लागली
माया आईची माझ्या मनी दाटू लागली

हात केसातून फिरता जखम वाहू लागली
गाय वेडी पाडसाला वनी चाटू लागली

बघता तिला सृष्टी सारी गोड भासू लागली
काळजाची जीवघेणी धून फाटू लागली

शांतता एकटेपणाची मला भेटू लागली
बायकोच्या भव्य कुशीत रात रेटू लागली

फडफडलो वादळातुनी आग पेटू लागली
झुळूक वेडी वार्याची अंग लपेटू लागली

पांगनार्या सावल्यांना वेळ काटू लागली
घेतानाच निरोप का दया आटू लागली ?

फेडली बाई रस्त्यात गर्दी पांगू लागली
वस्तीत झुंड हिजड्यांच्या टाळ्या पिटू लागली

बायको पुन्हा मला ....


बायको पुन्हा मला नवी वाटू लागली
माया आईची माझ्या मनी दाटू लागली

हात केसातून फिरता जखम वाहू लागली
गाय वेडी पाडसाला वनी चाटू लागली

बघता तिला सृष्टी सारी गोड भासू लागली
काळजाची जीवघेणी धून फाटू लागली

शांतता एकटेपणाची मला भेटू लागली
बायकोच्या भव्य कुशीत रात रेटू लागली

फडफडलो वादळातुनी आग पेटू लागली
झुळूक वेडी वार्याची अंग लपेटू लागली

पांगनार्या सावल्यांना वेळ काटू लागली
घेतानाच निरोप का दया आटू लागली ?

फेडली बाई रस्त्यात गर्दी पांगू लागली
वस्तीत झुंड हिजड्यांच्या टाळ्या पिटू लागली

Sunday, September 15, 2013

देव माझा

 


आज पावेतो त्याला                         नाही कुणी पाहिला
शेंदुरच फसला                                  दगडाला

वाहिली मूर्तीपुढे                                 झाडावरची जिती फुले
जशी सुकली मुले                              भाकारीविना

तुटता झोपडी                                    तो मुकाही हरला
तरु उराशी धरल                                 देव्हारा

डोळे झाकून पाहती                           समोरची सृष्टी
अधू झाली दृष्टी उजेडातही

घाली बोटात अंगठ्या                       नसे मनगटी जोर
लागे भजनी थोर                               पाप शमविण्या

भिने खोल डोळ्यात                           देवाचीच नशा
होते दुर्दशा                                         जिंदगीची

ईश्वर नाही जागी                               ती आपली भूक
नेमके ठावूक                                      पुजार्याला

जन्माची पुढच्या                                 दावूनी भीती
लुबाडती किती                                     याच जन्मी ?

मशिदी. गुरुद्वारा                                   चर्च नी देवळे
अब्रूचे सोहळे                                       दिवसाढवळ्या

देवांचा देव                                            माणसांनी घडविला
विकास अडविला                                 पुजार्यांनी

असा कसा देव                                      झाला हो सक्त ?
गाडले भक्त                                           देवळात

श्रीमंतीला नाही जात                             चहूकडे हेच दृश
सारे गरीब अस्पृश                                 पैश्यापुढे

भिकार्याहून भिकारी                               मागतो दान
असे कसे ध्यान ?                                  देवाचे माझ्या

या तेहतीस कोटीमधी                             कुणाला भजावे ?
पोटाला पूजावे                                         माणसांनी

तो आहे त्याचा                                       जो धनाला पुजतो
त्यालाच तो पावतो                                  देव माझा

Saturday, September 14, 2013

बाबासाहेबांचा अभंग

पुस्तकांचा लोभी                    खपवी डोके
अज्ञानाची भोके                     बुजविली

लढला अहोरात्र                       न झोपता

अंधार कोपता                       प्रकाशाला

ओलांडूनी शतके                   अचूक जोखणारा

भविष्यात पाहणारा               विश्वदूत

झाला महामानव                 तुमच्या आमच्यातला

देव देवळातला                   ओशाळला

डोळ्यात घेवूनी आग            गात मुक्तीची गाणी

पाजीयले पाणी                  भल्याभल्यांना

"कोड"ग्या बिलाचे               भेदुनि तख्त

महिलांना केले मुक्त             जोखडातुनि

होता पिचलेला                  सारा कामगार

केला हलका भार                कायद्यान्वये

झापडे लावून आम्ही            अडकविला जातीत

कोंबला पुतळ्यात              पुजण्यासाठी

पडण्या पाठीवरी                प्रस्थापितांचा हात

स्वकीयांना घालूनी              लाथ उभे दारात

सजवूनी बुद्धाला                घालती साकडे

कापती कोंबडे                  सणावारी

खुडले ते बोट                  "लढा" म्हणणारे

वेगवेगळे नारे                  प्रत्येकाचेच

मार्ग नुसता सांगणारा         नव्हता मार्गदाता

होता मुक्तिदाता               बाबासाहेब !

Saturday, September 7, 2013

एका ब्राम्हण मुलेने मराठा समाजातील मुलाला पाठविलेले प्रेमपत्र

 एका ब्राम्हण मुलेने मराठा समाजातील मुलाला पाठविलेले प्रेमपत्र
(कुठे तरी माझ्या वाचनात आले )


पहिल्याप्रथम मी हे कबूल करते की मला तु खुप खुप आवडतोस.एखाद्या विद्वानाला साजेसं असं तुझं नाव आहे आणि कर्ण हे नाव एखाद्या दानशुर मराठ्यालाच शोभते.मी तुझे लेख वाचल्यावरच तुझ्या प्रेमात पडले आहे.एखादी लव्हस्टोरी बघताना मला तुच दिसतोस.खरं तर मी पहिल्यांदा घाबरले होते पण म्हंटलं मराठ्यांच्या घरात जायचंय म्हंटल्यावर धाडसी बनले पाहिजे.मी ब्राह्मण आहे पण पवित्र हं(एक दोन अपवाद असतात ब्राह्मण समाजात हं सगळ्याच काही एकसारख्या नसतात),मला मराठा-ब्राह्मण वादाशी काही देणं घेणं नाही.कारण मला माहीत आहे की मराठेच खरे मर्द आहेत मराठ्यांमुळेच हिंदू आणि हिंदूस्थान दोन्ही सुरक्षीत आहेत.मला रात्री झोप येत नाही की दिवसा चैन पडत नाही (हे सगळ्याच ब्राह्मण स्त्रियांचे हाल असते असो..)सारखा सारखा तुच समोर दिसतोस, ह्रुदयामध्ये फ़क्त तुझेच विचार असतात कसा आहेस रे माझ्या लाडक्या ?
              पहिल्यांदा तुझा ब्लॉग वाचला तेंव्हा अस्सा राग आला होता.पण मी सहन केलं कारण तुझ्याच काही लेखात असे नमुद केले आहे की सत्य अमान्य केल्याने असत्य होत नाही सत्यच राहतं.खरं तर तुझ्या ब्लॉग वरील धाकलं पाटील हे नाव मला जास्तच तुझ्या जवळ आणतं कारण पाटील आणी ब्राह्मण स्त्रिया यांचं फ़ार पुर्वीपासून खुप जवळचे संबंध आहेत.खरं तर माझं असं प्रामानिक मत आहे की मराठा - ब्राह्मण वादात आम्हाला अडकू नये कारण आम्ही नेहमी तुमच्यासोबत आहोत.कारण तुमच्याशिवाय आम्ही राहू शकत नाही.आमचे शेळपट पुरुष काय करतात यांच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही.
     मला तडफ़दार पुरुष खुप आवडतात, त्यात विद्वत्ता आणि तडफ़ एकत्र आली की पुरुष काय सुंदर दिसतो, अगदी हवाहवासा वाटतो.त्यात परत विद्वत्ता आम्हा ब्राह्मणांमध्ये कमी आणि विक्रुतीच जास्त आणि तडफ़ फ़क्त तोंडातच पण आता ती तडफ़ देखील संभाजी ब्रिगेड उखडून काढील यात शंकाच नाही.आज विद्वत्ता मराठ्यांमध्येच जास्त दिसून येते.बाय द वे तुझा ब्राह्मण आणि बुद्धीमत्ता हा लेख खुप आवडला, तु कसं काय एवढं लिहु शकतोस रे माझ्या सोन्या ? . हो खरय ब्राह्मण हे एकेकाळी विद्वान समजले जात, पण ह्ल्ली असे काही राहिलेले नाही. हल्लीचे ब्राह्मण एकतर कारकुणकी करतात किंवा सत्यनारायणाची पोथी सांगुण कसेबसे पोट जाळतात.आमच्या ब्राह्मण समाजात तोंडात फ़ार बळ स्वत:ला फ़ार हुशार समजतात,स्वत:ला विद्वान ,शुरवीर काय काय म्हणवतात , सारखा सारखा धोशा लावतात.पण इतिहास बघता ब्राह्मण समाजात एकही शुर जन्मला नाही.एकही विद्वान जन्मला नाही, तोंडावरची माशी नाही उटेना आणि म्हणे लोकमान्य काय आणि स्वातंत्र्यवीर काय, आणि कथा कविता तर इंग्राजांच्या चोरून आणायच्या हे असले आमचे लेखक, सगळी लेखनीची करामत. आमच्या समाजात शिवाजी राजे , संभाजी राजे यांच्या तोडीचा एकही राजा झाला नाही नुसतीच चाकरी.खरं तर हजारो पिढ्यांपासून शिक्षण घेत असलेल्या ब्राह्मण समाजाला  तिसर्या पिढीपासून शिक्षण घॆणार्या मराठ्यांनी पायदळी तुडवले यावरून ब्राह्मणांनी लायकी समजुन येते.कुठे तुम्ही मराठे "मोडेन पण वाकणार नाही " आणि कुठे ब्राह्मण "चमडी जाय पर दमडी ना जाय" .मराठे कसे प्रत्येक क्षेत्रात पुढे.मला मराठ्यांचा कणखरपणा ,रांगडेपणा,ताठरपणा खुप आवडतो ,त्यामुळे मला मराठा समाजाचे फ़ारच आकर्षण आहे, परत तु तुझ्या प्रोफ़ाईल ला लावलेला तुझा फ़ोटॊ माझ्या घरी आणि पर्स मध्ये जपुन ठेवला आहे.मी तो फ़ोटो सारखा सारखा छातीशी कवटाळुन ठेवते.तु त्या फ़ोटॊत खुपच हॅंडसम दिसतोस.कधी रे आपली भेट होईल ? कधी तु माझ्याशी गुलु गुलु गप्पा मारशील रे आणि कधी तु मला घट्ट कवटाळशील ? कधी मला त्या स्वर्गात घेऊन जाशील ?(इश्श ! बोलताना अंगावर शहारे मारलेत) परवा मी कोल्हापुरला आले होते, भेटायला वेळच नाही मिळाला मग रात्री मित्रांसोबत अप्सरा थिएटर मध्ये एक फ़िल्म बघितली आणि परत फ़िरले.
           मी २७ वर्षाची आहे.(तुझे वय कितीही असो आम्हाला चालते..) अजुन लग्न केलेले नाही, का माहीत आहे ? मी आहे अशी विद्वान आणि दिसायला देखणी त्यात देवाने (हो देवच ब्राह्मण मुलांना जन्म देतात वडील नाही...) मला जन्माला घातले ब्राह्मण जातीत आणि आमच्यात पण बरेच भे्द तो कोकणस्त, तो देशस्त असे बरेच प्रकार आहे आणि मुख्य म्हणजे ब्राह्मण समाजाला धनसंचयाचे फ़ार वेड त्यामुळे मुलींना बिनलग्नाची ठेवून होता होईल तेवढा धनसंचय करायचा.ब्राह्मण समाज आजही मुली-महिलांना बाजारातील वस्तू म्हणुन पाहतो त्यामुळे ब्राह्मण मुलींची लग्ने ३० ते ३५ वयानंतरच होतात हे समाजात अनुभवले असशीलच(पण मला धीर धरवर नाहीये कधी एकदाची तुझी होतेय असं वाटतय).आमच्या वडिलांकडचे पुर्वज औंरंगजेब महाराष्ट्रात आला तेंव्हा त्यांच्याकडे चाकरी करायचे आणि आईकडचे लोक जमीनदाराच्या घराची चौकीदारी करायचे.आईच्या म्हणण्याप्रमाणे आईंची घरची परिस्थीती हालाक्याची होती त्यामुळे आजोबांनी (आईच्या वडीलांनी) आईला (मुलीला गरोदर केली असे काहीसे..) खोटेनाटे आरोप करून वडीलांच्या गळ्यात बांधली.
        ब्राह्मण लोकं खुप विचित्र असतात त्यांना कोणी पुढे गेलेलं अजिबात बघवत नाही,कोणत्या न कोणत्या प्रकारे बहुजन महापुरुषांचा अपमान करायचा हे त्यांचे एककलमी कार्यक्रम आहेत आणि ब्राह्मण स्वप्नाळु असतात बरं का व जातीयवादात तर ब्राह्मण पुर्वीपासून नेहमीच पुढे आहे , लपुन वार करणे हे ब्राह्मणांकडूनच शिकावे.ह्याउलट मराठा लोकं अतिशय मोकळ्या मनाचे असतात आणि तडफ़दार असतात. हुशार असतात उंच दिमाखदार, बाणेदार रूंद छातीचे असतात नाहीतर आमचे ब्राह्मण पुरुष बिनडोक, शेळपट, नपुंसक(म्हणुनच आम्ही आईचे असतो वडीलांचे नाही.) किरकोळ काटक्या नुसत्या.ब्राह्मण पुरुष विक्रुत,बेईमान ,विश्वासघातकी, कापती,लबाड असतात यावर जागतीक मानववंश शास्त्रज्ञांचे एकमत झाले आहे.तसेच ब्राह्मण पुरुष वीर,आक्रमक आणि वीर्यवान नसतात हेही मान्य झाले आहे (संदर्भ : ’शिवरायांच्या बदनामीची केंद्रे’)
आजचे ब्राह्मण तर दारू आणि मटन दणकुण खातात.मी तर असं एकले आहे की कोकणात ब्राह्मणांमुळेच मटन व दारू महाग झाले आहे.मला ब्राह्मण पुरुषाशी लग्नच करायचे नव्हते.ब्राह्मण पुरुष स्वत:च्या बायका-मुलांचे रक्षण देखील करू शकत नाही.कंजुषी तर त्यांच्या नसानसांत भिनलेली असते.आम्हा मुला - बायकांची हौस करण्याची या नालायकांची ऐपतच नाही तुम्हा मराठ्यांकडे कशी पिढीजात श्रीमंती असते.तुमचे पुरुष कसे ताठ मानेने जगतात(आम्हाला ताठ शब्द फ़ार आवडतो आमच्या पुरुषांना मात्र त्याचे वावडे आहे).माझ्या मम्मी ने तर मला असे सांगितले होते की ब्राह्मणांचा बहुतांशी वंश मराठेच चालवितात.मराठे कसे प्रत्येक पावलाचा विचार करतात, आपली प्रतिमा जपण्यासाठी प्राण पणाला लावतात,किंबहुना मराठा जातीत खोटेपण आणि विक्रुतीला थारा नाही.
मला तुझ्या लिखाणातून तु तसाच असावास असे वाटते,नव्हे नव्हे मला माहित आहे , तु  तसाच आहेस.प्रियतमा मला लवकर आपले कर , ही २७ वर्षाची कुमारिका तुझी वाट बघते आहे.तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसले आहे.मला तुझ्यासोबत स्वर्गिय सुख अनुभवायचे आहे मग येशील ना रे ? आय लव्ह यु ! इश्श ! 
आता तुला प्रश्न पडला असेल की मी कशी दिसते ? कशी दिसते ? माझा वर्ण गोरा आहे (इंग्रजांसारखा),उंची पाच फ़ुट सव्वाचार इंच आहे,सडपातळ बांधा आहे ,परवा मराठा पुढार्याच्या घरी पुजा होती तर चार दिवस दणकुण खाऊन सडपातळ बांधा थोडा अ-सडपातळ अथवा स्थुल झाला आहे पण मी सध्या चालण्याचा  व्यायाम करीत आहे फ़क्त तुझ्यासाठी. नाकी डोळी निटस आहे.तु परवा आलेला "अय्या" सीनेमा पाहिला आहेस का ? मला वाटते मी नव्वारी साडीत अगदी राणी सारखीच दिसते.मला स्वयंपाक खुप छान करता येतो (ब्राह्मण असुन सुद्धा..) मटन आणि चिकन तर मस्तच, बोटे चाटत राहशील तू ! माझ्या भाकरी पोळ्यापेक्षा पातळ असतात.मी एक चांगली मुलगी आहे आणि वयाच्या २७ च्या वर्षी सुद्धा  पवित्र आहे (ब्राह्मण असुन सुद्धा..) ,मला मराठी कथा ,कादंबर्या खुप आवडतात.
  असो,  जर का ब्राह्मण हत्या झाल्या तर माझ्या बहिनींची काळजी घॆशील ना रे ? त्यांना माझ्यासारखं सुख देशील ना रे ? कारण त्या त्या सुखाला पारख्या होतील.खरच एक दिवस ब्राह्मण नाश होईल असे वाटत आहे.तेंव्हा मी झुरते आहे तुझ्यासाठी , तुझ्या रांगड्या रुंद छातीवर डोके विसावण्यासाठी आणि ते सुख भोगण्यासाठी (इश्श ! काहीही विचार येतात मनात). 
मम्मीला वाचनाची आवड..  माझ्या मम्मीच्या म्हणण्यानुसार.मम्मीने आजपर्यंत आमच्या समाजातील दहा-बारा पुरुष अनुभवून पाहिले आहेत.सुख म्हणून काही मिळाले नाही, मेले काही करतच नाहीत, सगळं मराठयांनाच करावं लागतं."शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून तर खेडेकर साहेब ब्राह्मण स्त्रियांच्या गळ्यातील ताईद (तावीज) झाले आहेत. त्यामुळे तावीज  पुढे मंगळसुत्रपण तोकडे पडले आहे.माझ्या मम्मीला तर उठता - बसता , झोपताना ,आंघोळ करताना देखील ......(इश्श ! हे सांगताना माझे गाल कसे लाल लाल झाले आहेत ).
खुप काही लिहावसं वाटत आहे पण आता पुर्णविराम देते, भेटल्यावर बोलुच.तेंव्हा माझ्या सोन्या,माझ्या लाडक्या राजा,लवकर ये रेल्वे ने, बस ने अथवा कालिदासाचा मेघ बनून ये.मी आता स्वत:ला कंट्रोल नाही करू शकत.होता होईल तेवढे लवकर ये ! पत्राचे उत्तर वगैरे द्यायच्या भानगडीत न पडता निघुन ये लवकर आणि माझ्यावर मन भरुन लव कर (अय्या काय योगायोग आहे हा.) माझ्या राजा ! आय लव्ह यु , लव्ह यु ,लव्ह यु स्स्स्स्सो मच उउउउउम्म्म्म्ह्ह्ह्हा, इश्श ! कागद भिजला सॉरी हं.
आय लव्ह यु स्स्स्स्स्सो मच..
टाटा बाय बाय ,काळजी घे !

Friday, September 6, 2013

जंगले सारी खुडुनि

जंगले सारी खुडुनि पहा रोवली कुंडीत
पाखरे हिंडती नभी श्‍वास आपुला धुंडीत

लोपली हिरवी झगमग दिव्यांचा अंध प्रकाश
परतले उजेडात देव होते गाठलले खिंडीत

घेऊन हाती आरसे परंतु झाकती चेहरे
राहुनि नामानिराळे ते माणसांच्या झुंडीत

पायाला बांधून चक्रे पळतात सैरावैरा
पाठलाग मरणाचा पण धुंद आपुल्या दिंडीत

असतेच प्रेम असेही शरीराच्या पल्याडले
मीळते उब मायेची गच्च मीठीतील थंडीत

कढीच्या शिळेपणाला दिली खमंग फोडणी
ऊत-मात झाला सुरू दहिकाल्याच्या हंडीत

देऊनी ठाम नकार सार्या नावडत्या गोष्टींना
झाले सुरू युध्द पुन्हा हिशेब जुनाच मांडीत

Friday, August 30, 2013

भटकळला पकडले, दाऊदचे काय ?

इंडियन मुजाहिदीनचा मास्टर माईंड आणि संस्थापक यासीन भटकळला बेड्या ठोकण्यात भारतीय तपास यंत्रणांना यश आले आहे. देशभरात त्याच्यावर 50 पेक्षा जास्त बॉम्बस्फ्पटांचा कट रचल्याचा आरोप असून तो 12 राज्यातील पोलिसांना हवा होता. राष्ट्रीय तपास संस्थेने त्याच्यावर 35 लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते. यासीन भटकळला अटक होणे, हे भारतीय सुरक्षायंत्रणाचे मोठे यश मानावे लागेल. गेल्या चार वर्षांपासून राज्यातील आणि केंद्रातील तपास यंत्रणा यासिन भटकळच्या शोधात होत्या. देशात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये यासीन भटकळचाच हात होता, हे तपासात स्पष्ट झाले होते. वेगवेगळ्या तरुणांच्या साह्याने भटकळ पूर्वनियोजित कट आखून गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवून आणत होता. त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत होते. भटकळ मुळचा कर्नाटक राज्यातील भटकळ गावचा रहिवासी आहे. त्याचे खरे नाव अहमद सिद्दीबाप्पा आहे. देशभरात इंडियन मुजाहिदीनचे नेटवर्क तो आणि त्याचा भाऊ रियाझ याने उभारले. रियाझला भेटण्यासाठी तो नेपाळला गेला होता. तिथेच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. महमुद असद नावाने त्याने पासपोर्ट बनविला होता. त्याचाच वापर करुन तो नेपाळला जात होता. दिल्लीत त्याचे सासर असून अनेक वर्षे तो तिथे वास्तव्यास होता.
काही दिवसांपूर्वी कुख्यात दहशतवादी अब्दुल करीम टुंडा याला अटक केल्यानंतर भटकळला जेरबंद करुन ‘एनआयए’ने मोठे यश संपादन केले आहे.
दिल्लीतील जामा मशिद बॉम्बस्फोट, पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट, 2008 सालचा अहमदाबाद बॉम्बस्फोट, 2010 साली वाराणसी येथे झालेले बॉम्बस्फोट, 2013 चे हैदराबाद आणि बंगळुरु येथील बॉम्बस्फोटांचे कट भटकळने रचले होते. भटकळने पोलिसांना गुंगारा देऊन अनेकदा पळ काढला. परंतु, अखेर त्याला अटक करण्यात आली.
पुण्या-मुंबईसह ’हाराष्ट्रातील गणोशोत्सवाला टार्गेट करण्याचे आदेश यासीनला पाकिस्तानकडून ि’ळाले होते. यापूर्वी त्याने पुण्यातील दगडूशेठ गणपती मनदिराची रेकी केली होती, यासीनला भारत-नेपाळ सीमयेवर अटक करण्यात आली तेव्हा त्याने नेपाळमधील एका प्रकल्पावर काम करीत असल्याचे सांगितले. संगणक अभियंता म्हणून तेथे काम करतो, अशी माहिती तने दिली. परंतु, पोलिसांचे समाधान न झाल्याने मी युनानी डॉक्टर असल्याचे त्याने सांगितले. अखेर त्याला अटक करण्यात आली. इंडियन मुजाहिदीनचा सदस्य असादुल्लाह अख्तर यालाही यासीनसोबत अटक करण्यात आली.
दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूर आणि हैदराबाद बॉम्बस्फोटकिंचे कट यासीनने रचले होते. 13 जुलै 2011 रोजी मुंबईत झालेल्या तिहेरी बॉम्बस्फोट मालिकेतील ऑपेरा हाऊस आणि झवेरी बाजार येथील बॉम्ब यासीनने स्वतः ठेवले होते. यापूर्वी तो मुंबईत भाड्याने राहत होता. भायखळा येथील ‘एटीएस’च्या कार्यालयापासून अवघ्या 100 फुटांवर तो भाड्याने राहत होता. मी संगणक अभियंता आहे, असे सांगून त्याने घर घेतले होते. या बॉम्बस्फोट’ध्ये गुजराती लोकांसह व्यापारी लोकांना टार्गेट करण्यात आले होते.पुण्यातील दगडूशेठ हलवाई मनदिराची यासीननेच रेकी केली होती. ही माहिती उघडकीस आल्यावर या मनदिराची सुरक्षा वाढविण्यात आली होती. या मनदिराजवळ मोठा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा यासीनचा प्रयास होता. पुण्यातील जर्मन बेकरीत यासीन भटकळनेच बॉम्ब ठेवला होता, असे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमीर्‍यात यासीन टोपी घालून दिसला होता. बॉम्बस्फोटच्या दिवशी त्याने दुकानाला भेट दिली होती. तेव्हापासून पुणे पोलिस त्याचा मागावर होते.
पुण्या-मुंबईतील बॉम्बस्फोटांसह दिल्ली, बंगळूर, हैदराबाद बॉम्बस्फोटआचे कट भटकळने रचले होते. इंडियन मुजाहिदीन या संघटनेत दहशतवाद्यांची भरती करण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती.
यासीन भटकळची माहिती देणार्‍याला 10 लाख रुपयांचे बक्षिस महाराष्ट्र पोलिसांनी जाहीर केले होते. महंमद अहमद, महंमद जलाल, इमरान आणि शाहरुख यांना त्याने नुकतेच रिक्रुट केले होते. त्यांची छायाचित्रे ’हाराष्ट्र ‘एटीएस’ने जाहीर केली होती.
पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात दोन विदेशी पर्यटकांसह 17 जण ठार झाले होते. या शक्तिशाली बॉम्बस्फोटात 56 नागरिक जखमी झाले होते. पुण्यातील जंगली महाराज रोडवर 1 ऑगस्ट 2012 रोजी झालेल्या बॉम्बस्फोटांचा यासीन सूत्रधार होता. यात एक नागरिक जखमी झाला होता. बॉम्बची असेम्ब्ली योग्य प्रकारे न झाल्याने त्याची तीव्रता कमी झाली होती.
गेली दहा वर्षे तो भारतीय सुरक्षायंत्रणेला हुलकावण देत होता. त्याने पुणे शहराला दक्षिण भारतातील हालचालीचे एक महत्वाचे केंद्र बनविले होते. त्याला कर्नाटक पोलीस व केंद्र सरकारची नॅशनल इंटेलिजन्स एजन्सी यानी नेपाळ सीमीवर अटक केल्याने गेली दहा वर्षे पुण्यात दहशतवादी कारवायांचे ठाणे उखडण्याची कोंडी फुटणार आहे.
सीबीआय आणि रॉ यांची मदत घेतल्यास मोठ्यात मोठ्या दहशतवाद्यालाही अटक करता येते, हे आता स्पष्ट झाले आहे. भटकळला अटक झाल्याने दहशतवादाच्या जाळ्यातले काही बरेच धागे आता हाती लागतील, अशी आशा वाटायला लागली आहे. तुंडा आणि भटकळ यांना अटक झाल्यामुळे दहशतवादी कारवायांच्या शेवटाची सुरूवात झाली आहे असे म्डटले तर अतिशोक्ती ठरू नये .
1979 सालपासून भारतविरोधी अतिरेकी शक्तींसाठी काम करणार तुंडाने दिलेल्या माहितीच्या आधारावर यासीन भटकळ याला अटक करता आली आहे. त्याच्या सोबत त्याचा दुसरा सहकारी असादुल्ला यालाही अटक झाली आहे. तुंडा बोलायला लागला म्हणून यासीन भटकळ सापडला. आता यासीन भटकळ बोलायला लागला की भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे हात अन्य दोन भटकळ बंधूंपर्यंत आणि पर्यायाने दाऊद इब्राहिमपर्यंत पोचण्याची आशा आहे.आजवरच्या दहशतवादी कारवायामध्ये सापडलेल्या संशयित गुन्हेगारांच्या जबाबामध्ये रियाज आणि इक्बाल भटकळ ही दोन नावेसुध्दा वारंवार आलेली आहेत. हे दोन बंधू पोलिसांना सापडणेसुध्दा फार महत्त्वाचे आहे. रियाज आणि इक्बाल भटकळ हे दोन सख्खे भाऊ आहेत. यासीन त्यांचा कोणी नाही. ते तिघेही कर्नाटकाच्या मनगळूर जिल्ह्यातील भटकळ गावचे राहणारे आहेत. खरे म्हणजे रियाझ आणि इक्बाल या दोन भावांचे आडनाव शहाबंद्री असे आहे आणि त्यांचे कुटुंब अजूनही भटकळमध्येच राहते.. 2005 साली इंजिनियर रियाज हा घरातून पळाला आणि त्याने दाऊद इब्राहिमशी संधान साधून दहशतवादी कारवाया मध्ये सहभागी होण्याचे ठरवले. त्याच्या पाठोपाठ 2010 साली त्याचा भाऊ डॉक्टर इक्बाल हाही पळाला. तो तर डॉक्टर होता. तर असे हे दोन बंधू आता पाकिस्तानमध्ये दाऊद इब्राहिमच्या आश्रयाने राहत आहेत.दाऊदला पकडायचे असेल तर यासीनला पकडणे महत्त्वाचे होते. आता या दोन बंधूंपर्यंत गेले तरच दाऊद सापडू शकेल.
देशात दहशतवादी हल्ले घडू नयेत म्हणून सध्या पावलोपावली सुरक्षा यंत्रणा दिसते. पुण्यात झालेल्या या स्फोटाबरोबरच देशात जेंव्हा जेंव्हा असे स्पष्ट झाले तेंव्हा तेंव्हा पुणे पोलिसांनी सरकारी कार्यालये, रेल्वे स्टेशन,विमानतळ अशा रहदारीची ठिकाणे आणि मोठमोठ्या बाजारपेठा, हॉटेले, विद्यापीठे, महाविद्यालये, हजारो सहकारी गृहनिर्माण संस्था आणि छोटे मोठे कारखाने यांना सुरक्षा वाढविण्यास सांगितले. पुणे शहर आणि पुणे - मुंबई मार्गावरील सर्व शहरे आणि नगरे येथील आस्थापनावरील सुरक्षा कर्मचारांची संख्या एक लाखावर आहे. अर्थात ही संख्या जशी मुंबईत आहे तशीच पुण्यात आहे. देशाच्या प्रत्येक राज्यात व प्रत्येक शहरात आहे. पण अशा दहशतवाद्यांच्या हालचाली काय आहेत त्यांच्याकडे कोणती साधने आहेत आणि त्यांच्या तपासात या मोठ्या मनुष्य बळाचा काय उपयोग होऊ शकतो, याचा कसलाही विचार नसल्याने देशातील अशाच पद्धतीने उभे केलेले एक कोटीपेक्षाही अधिक सुरक्षा रक्षक ही बुजगावणी झाली आहेत.
ज्या खर्चावर जनतेचे हजारो कोटी रुपये खर्च होतात तो खर्च जर अशापद्धतीने अनुत्पादक केला जात असेल तर रुपयाची अवस्था दयनीय होणार नाही तर काय होणार?
नेपाळच्या सीमीवर यासीनला अटक झाली ती पोलिसांच्याच कौशल्याने. पण एक कोटी सुरक्षा यंत्रणा हाताशी असल्यावर ही कामी ज्या गतीने व्हायला हवीत, तशी न झाल्याने जेहादी दहशतवाद्यांनी जाहीर केलेले युद्ध सुरुच राहणार आहे. पाकिस्तान आणि ‘अल् कायदा’शी संबंध असलेल्या भटकळचा मुक्काम पुण्यातील पिंपरी चिंचवड भागातील एका भंगार साठवण्याच्या गोडावूनमध्ये होता. एकदा अटक झाल्यावरही पोलीसांच्या तावडीतून सुटून तो येथे पळून आला होता व जर्मन बेकरीचा स्फो ट झाल्यावर पोलिसांना त्याचा सुगावा लागल्याने त्याने पुण्यातून मुक्काम हलविला. देशातील आठ राज्यात त्याने अशा स्फोट मालिकांचे यशस्वी व अयशस्वी प्रयत्न केले. त्याचा सर्वात अलिकडचा स्फोट म्हणजे बिहारमधील गया येथील बौद्ध विहारात घडविलेला स्फोट
दहशतवाद्यांचे हे हल्ले रोखणसाठी सुरक्षादलांमधये सुसूत्रता आणली पाहिजे. तरच ते हल्ले थांबणे शक्य आहे. नाही तर एखाद्या भटकळच्या अटकेवरच समाधान मानावे लागेल. अर्थात हे युद्ध फक्त भारतापुरते मर्यादित नाही. सार जगात त्याचा परिणाम जाणवत आहे. दहशतवादाविरूध्द सर्व जगानेच युध्द पुकारले पाहिजे. आणि त्यावर कायमचा तोडगाही शोधाला हवा.


- भगवान निळे

मला भूतकाळ जगायचा नाही...



आपली पहिली भेट झाली
तो क्षण सुदैवी की दुर्दैवी याचा मी कधीच केला नाही विचार
आपली भेट झाली हेच महत्वाचे .

आपण दुरावलो _
मी दुखावलो.

तू दुखावालीस की नाही
याचाही मी विचार करीत नाही.
फक्त
आपण दुभंगलो
त्या वळणावर स्वताला सोडून
मी एकटाच माघारी परतलो .
मनसोक्त आंघोळ करून
मी घेईल आता दीर्घ झोप
नि, झोपेतच
आपण मिळून उपभोगलेल्या सुखांच्या
थडग्यावर मेणबत्ती पेटवून
पुन्हा गाढ झोपी जाईल .
आत्ता :
माझ स्वप्न माझ असेल
माझा क्षण माझ्या एकट्याचा असेल
माझी सावली माझी असेल.

तुला पुन्हा भेटवस वाटत नाही मला
मला भूतकाळ जगायचा नाही...

भुकेचे गणित कसे सुटेल ?



आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 66 वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही पोटापाण्याचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. भूक ही प्राणीमात्राची मुलभूत गरज आहे. मनुष्य त्याला अपवाद नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला दिवस-रात्र एक करावी लागत आहे. परंतु देशातील काही मंडळी मात्र जेवण्यासाठी जगतात की जगण्यासाठी जेवतात हेच कळत नाही. त्यांची भ्रान्त मिटलेली असते. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या अशा कुबेरांच्या जोडीला मात्र करोडो लोक असे आहेत ज्यांना पोटाला दोन वेळचेही अन्न मिळत नाही.
महासत्ताक राष्ट्र बनण्याच्या शर्यतीत उतरलेल्या आपल्या देशातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी रूपयाप्रमाणे न घसरता महागाईप्रमाणे वाढतच चालली आहे. ही वाढती दरी कमी करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना न करता मलमपट्टी करून दुखणे बरे करण्याचेच धोरण आजपर्यंत आपल्या राज्यकर्त्यांनी अवलंबिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मानवी विकास आणि कृषी क्षेत्राला गती देणारे  अन्नसुरक्षा विधेयक संमत करून बेरजेचे राजकारण केले आहे. मतांची बेगमी करण्यासाठी राजकारणाचा वापर करणे हे नेहमीच धोकादायक असते. असे राजकारण करण्यात सत्ताधारी पक्षाप्रमाणे विरोधी पक्षही आघाडीवर आहे, हे भारतीय लोकशाहीला मारक आहे.
ढोर मेहनत करूनही गरीब माणूस पैशाअभावी पोटाला चार घास अन्न विकत घेऊ शकत नाही. तो उपाशी- तापाशी मर मर राबतच असतो. अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करणा-या देशासाठी आणि आर्थिक महासत्तेचा दावा करणा-या आपल्यासारख्या राष्ट्राला ही लाजिरवाणी गोष्ट आहे. गरिबी व भूक संपविल्याशिवाय देशाच्या विकासाचा वेग वाढणार नाही.
अन्नसुरक्षा विधेयकामुळे आता केवळ एक ते तीन रुपयांत मासिक पाच किलो धान्य मिळणार असल्याने त्या व्यक्तीची अन्नाची चिंता कमी होईल. त्याची उत्पादनक्षमता वाढेल, अन्नधान्याचे उत्पादन अधिक होईल, रोजगार निर्माण होतील आणि आर्थिक विकासाचा वेग अधिक होईल,अशी भाबडी आशा बाळगण्यातही काही अर्थ नाही. पोटाची खळगी भरणे म्हणजेच समृध्द जीवन जगणे नसते. पशू पक्षी, जनावरेही आपले पोट भरून जगतच असतात. केवळ पोट भरणे हेच त्यांचे एकमेव उध्दिष्ट असते. तसे मानवाचे नाही. आधुनिक काळात त्याचे राहणीमान उंचावले आहे.भूकेशिवाय त्याच्या अनेक मुलभूत गरजा आहेत. ज्या कधीच भागविल्या जात नाहीत.
देशाच्या एकूण जीडीपीपैकी सुमारे 3 टक्के रक्कम या योजनेसाठी खर्च होणार आहे. पण ही टक्केवारी 1.6 टक्क्यांच्या वरही जात नाही. कारण अन्नसुरक्षा विधेयकात समाविष्ट करण्यात आलेली कुटुंबे ही अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी नाहीत. सध्या अंत्योदय योजनेचा लाभ देशातील सुमारे अडीच कोटी कुटुंबांना होत आहे. या कुटुंबांना दर महिना एक रुपयात 35 किलो धान्य मिळत आहे. भविष्यात अन्नधान्याचे उत्पादन  सध्याच्या उत्पादनापेक्षा अधिक झाल्यास खर्च खाली येऊ शकतो, याचाही विचार व्हायला हवा.
गरिबांना कमी भावाने धान्य दिले पाहिजे पण ते देताना त्यांना  पोटभर खाता यावे हाच हेतू असला पाहिजे. देशातल्या गरीब लोकांना स्वस्त धान्य पुरवण्याची तरतूद या विधेयकात आहेच, पण दारिद्य रेषेच्या वर राहणार्या  काही लोकांनाही बाजारभावापेक्षा कमी भावाने धान्य देण्याची तजवीज आहे. दोन्ही गट धरून देशातल्या 64 टक्के  लोकांना कमी दरात धान्य देण्याची सरकारची योजना आहे. त्यातल्या दारिद्य रेषेखालील लोकांना तीन रुपये दराने तांदूळ, दोन रुपये दराने गहू आणि एक रुपये प्रति किलो दराने बाजरी देण्याचा विचार आहे. कुटुंबातल्या एका व्यक्तीला दरमहा सात किलो असे पाच जणांच्या कुटुंबाला दरमहा 35 किलो धान्य दिले जाणार आहे.
देशातल्या काही राज्यांत अशाप्रकारची  योजना सुरू आहे. ती दारिद्य रेषेखालच्या लोकांसाठीच आहे. केंद्र सरकारने दारिद्रय रेषेवरचाही एक वर्ग या योजनेत समाविष्ट केला आहे. केवळ दारिद्रय रेषेखालचा वर्ग यात घेतला तर तो लोकसंख्येच्या 40  टक्के भरतो, पण त्यात नवा वर्ग समाविष्ट केला तर तो लोकसंख्येच्या 64 टक्के होतो. आधी या विधेयकात ग्रामीण भागातल्या 46 टक्के लोकांचा समावेश होता. तो आता 75 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी शहरातल्या 28 टक्के लोकांचा समावेश होता तो आता 50 टक्के करण्यात आला आहे. या दोन्ही आकडय़ांची सरासरी काढली तर ती एकूण लोकसंख्येच्या 64 टक्के होते. यातल्या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या रेषेच्यावरच्या लोकांना फार सवलतीने धान्य मिळणार नाही,  पण सरकार हे धान्य ज्या हमी भावाने खरेदी करते त्याच्या निम्म्या दराने मिळेल. अशा रितीने 64 टक्के लोकांनाच काय पण 100 टक्के लोकांना जरी स्वस्त धान्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला तरी काही हरकत नाही. पण त्याचा बोजा सरकारची तिजोरी कशी उचलणार हा प्रश्न आहे.
या योजनेसाठी  सरकारला दरसाल 95 हजार कोटी रुपये मोजावे लागतील. सरकार गव्हाची खरेदी 11 रुपये प्रती किलो या भावाने करत आहे आणि तांदळाची खरेदी 11 ते 18 रुपये प्रती किलो या भावात करत आहे. असे हे धान्य खरेदी करून ते केवळ दोन किंवा तीन रुपयांना लोकांना पुरवणे हे कल्याणकारी असले तरी  त्याचा परिणाम देशाच्या तिजोरीवर कसा होईल याचाही विचार केला पाहिजे. देशाचा चेहरामोहरा बदलणारे,  सामाजिक परिवर्तनाला दिशा देणारे, कल्याणकारी राज्याची संकल्पना वास्तवात आणणारे हे विधेयक असले तरी ज्या लोकांपर्यंत ही अन्न सुरक्षा पोहोचवायची आहे,
ज्या लोकांच्या फायद्यासाठी हे विधेयक आणण्यात आले आहे .त्याचा लाभ त्या लोकांपर्यंत पोहचेल का हाही एक प्रश्न आहे. ज्यांच्या मुखात अन्न पडावे  या हेतूने ही योजना केली आहे त्यांना ते अन्न मिळेल का ?  वितरण व्यवस्था सुधारल्याखेरीज या कायद्याची अंमलबजावणी नेमकेपणाने होणार नाही. त्यासाठी सरकारने सार्वजनिक वितरण प्रणाली माध्यमातून ही योजना पारदर्शीपणे आणि भ्रष्टाचारमुक्त कशी राबवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे. सरकार कशाप्रकारे भुकेचे गणित सोडवते हे येत्या काही वर्षातच समोर येईल.

Wednesday, August 28, 2013

ghadyal

script src="//www.gmodules.com/ig/ifr?url=http://totalgta.net/igoogle/tools/clock/clock.xml&amp;synd=open&amp;w=185&amp;h=360&amp;title=Analog+Clock&amp;border=%23ffffff%7C3px%2C1px+solid+%23999999&amp;output=js"></script>

रडलो मी जरासा


पाहुनी वाट तिची रडलो मी जरासा
थांबू नकोस तुही पावसा पड जरासा

घामाचा गंध तिच्या पसरे रानोमाळी
पाहुनी कष्ट तिचे उडलो मी जरासा

हरवले हासणे अन विसरली लाजणे
झुंडीत लांडग्यांच्या नडलो मी जरासा

आरसा पुसला तरी भाग्य उजळेना
पाहताना स्वताला अडलो मी जरासा

हुलकावण्या देत मरणाला जगतो असा
उठलो, पडलो तरीही झडलो मी जरासा

करती बोभाटा ते माझ्या वागण्याचा
प्रेमात दुष्मनाच्या पडलो मी जरासा

सोसले तिने जितके सोसायचे होते
दुख्खाशी तिच्या जडलो मी जरासा

Monday, August 26, 2013

खुळखुळा



वेश त्यांचा वेगळा अन देशही वेगळा
देव त्यांचा वेगळा श्वास आमुचा वेगळा

देवळे उभारली त्यांचा पाडुनी उभ्या शाळा
उरला आमुच्या हाती आभाळाचा फळा

नको बळ आता उरल्या दुख्खाच्या कळा
जो तो इथे दाबतो हुंदका हा कोवळा

बसे जाऊनी संसदी गल्लीतला बावळा
वेगळा दिसे सिंहासनी कालचा कावळा

आमुच्या ढेकरांनी करपे त्यांचा ळा
नुसत्या पादन्याचाही ते करती सोहळा

फासुनी भाळी नीळा लावला आम्ही  टिळा
कमरेस आता कधीचा खोचला मी विळा

लढन्यातच जरी गेला सारा जन्म खुळा
जगही बदलू शकतो वाजणारा खुळखुळा

असे वाटते की...


 





असे वाटते की मला तू जपावे
मला सोसताना तुला तू जपावे

तुझ्या शुष्क ओठी माझे गीत यावे
मीटुनी तू डोळे मलाही पहावे

खुळ्या आठवांचा सडा कोसळावा
विसरुनी मला तू स्वतःला स्मरावे

मी गावे गोडवे तुझ्या छळाचे
पाहुनी स्वत:ला आरसी लपावे

पुन्हा रात्र यावी चोरपावलांनी
तुला मी भुलावे मला तू गुणावे

फुटावी मीठीतून वाट चांदण्याची
अशा काळोखाला उराशी धरावे

तुझ्या सावलीची तुला वाटे भीती
तुझे वागणे का तुलाही खुपावे?

Friday, August 23, 2013

कसे रोखणार बलात्कार ?


मुंबईतील परळ भागात महिला छायाचित्रकार म्हणून काम करत असलेल्या एका पत्रकार महिलेवर मुंबईतील सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी घडली. लोअर परळ आणि महालक्ष्मी यामधील रेल्वेमार्गालगतच्या भागातील शक्ती मील्स येथे रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही पीडित महिला छायाचित्रे काढण्यास शक्ती मीलनजिकच्या परिसरात गेली होती. त्यावेळी काही तरुणांनी तिला धमकावून जबरदस्तीने निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. नेहमीप्रमाणे या प्रकऱणाची गंभीरपणे दखल घेऊन आरोपींना लवकरात लवकर पकडू असे आश्वासन आर. आर. पाटील यांनी दिले आहे. तर विरोधकांनी सालाबादप्रमाणे आंबांच राजीनाम्याची मागणी केली आहे.
मीत्राला भेटण्यासाठी आलेल्या युवतीवर पोलीस शिपायासह आणखी तिघांनी अमानुष बलात्कार केलची घटना नुकतीच नांदेडमध्ये घडली. हिमायतनगर तालुक्यात राहणारी 8 व्या इयत्तेची विद्यार्थिनी आपल्या मीत्राला भेटण्यासाठी भोकर येथे आली होती. मात्र मीत्र न भेटल्याने ती गोंधळून गेली. त्याचा वेळी तिला भेटलेला पोलीस शिपाई सुनील संबाळकर याने तिला जबरदस्तीने रिक्षात घालून रिसोर्ट येथे आणले. तिच्यावर बलात्कार करून त्याने संदीप हंमद आणि राजू खांडरे या दोघा मीत्रांना बोलावून घेतले. त्यांनीही तिच्यावर बलात्कार केला.
तर, मुंबईच्या ’रिन लाईन्स् ते चर्नीरोड या स्थानकाच्या दरम्यान पहिल्या वर्गाच्या लोकलच्या डब्यातून प्रवास करणार अमीरिकीन महिलेवर अज्ञात चोरट्याने हल्ला केला. तिला जखमी केले आणि तिच्याजवळचा मोबाईल तसेच बॅग घेऊन पलायन केले.तसेच, मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यात स्वित्झर्लंडमधील एका महिलेवर सात जणांना सामुहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ती पतीसोबत ओरछा येथून आग्रयाला जात होती. रात्री काही जण काठ्या घेऊन त्यांच्याजवळ आले. दोघांनाही जबर मारहाण केली. त्यानंतर आळीपाळीने महिलेवर बलात्कार केला. तिला बेशुद्धावस्थेत रस्त्यावरच सोडून सर्वजण पसार झाले.
महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात देशभरात आगडोंब उसळलेला असताना बिहारमध्ये चालत्या रेल्वेत लष्करी जवानाकडून महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महिलेने चालत्या रेल्वेतून उडी मारून आपले शील वाचविण्याचा प्रयत्न केल्याने ती गंभीररित्या जखमी झाली. बिहारमधून आरा, बक्सर मार्गे दिल्लीकडे निघालेल्या ब्रह्मपुत्र एक्स्प्रेसमध्ये गुरुवारी दुपारी प्रसाधनगृहात गेलेल्या महिलेवर रमीश कुमार या जवानाने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तर, बलात्काराची राजधानी बनलेल्या दिल्लीत न्यायालयाच्या आवारात महिलेवर वकिलांकडून सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघड झाली आहे.घटसफोटाच्या खटल्याबाबत चर्चा करण्यासाठी एका महिलेला तिच्या वकिलाने पतियाळा न्यायालयात बोलावून घेतले. तिथे वकील आणि त्याच्या दोघामीत्रांनी या महिलेवर निर्घृण बलात्कार केला.
या सर्व घटनाकडे पाहिले असता का दिसते? केवळ गरीब कुटुंबातील, झोपडपट्टीतील, अशिक्षित महिलांवरच बलातकार होतात असे नाही तर सधन , सुशिक्षित घरातील महिलाही आता सुरक्षित राहिल नाहीत. इतकेच नव्हेतर केवळ गुंड प्रवृतीचे, व्सनी नराधमच बलात्कार करतात असे नाही. सुशिक्षित समजले जाणारे, काद्याचे आणि समाजाचे रक्षण करणची जबाबदारी असलेले वकील, पोलिस जवानल शिक्षक हेही बलात्कारासारखे निर्घृण बिभित्स कृत् करतात हे नाकारता येत नाही.
महिलांवरील लैंगिक शोषणाला आळा घालन्यासाठी विविध कायदे करून, कठोर शिक्षेची काद्यात तरतूद करून हा प्रश्न खरोखरच सुटणसारखा आहे का? शिक्षा वाढविलने गुन्हे कमी होत नसतात. प्रश्नाच मुळाशी जाऊन ,भावना बाजुला ठेवून सद्सद्विवेक बुध्दीने या प्रश्नाची सोडवणूक कराला हवी. लैंकिक कोंडी करून महिलांवरील लैंगिक अत्त्याचाराच्या अथवा बलात्काराच्या घटनांमध्ये घट होणार नाही.
डान्सबारवर बंदी घातलने बलात्कारच घटना कमी होतील असा आर, आर. पाटील यानचा आशावाद होता. पण बलात्कारांच्या घटनां’मध्ये वाढच होत गेली. केंद्र सरकारनेही बलात्काराविरूध्द कठोर कायदा केला तर देशभरात दररोज बलात्कार होतच आहेत. असे का होते याचा आपण कधी सारासार विचार करणार आहोत की नाही? विनयभंग, बलात्कार, मुलींची छेडछाड यांसारख्या गुन्ह्गयांवर होणार चर्चा आणि प्रतिक्रियांमधून कायदे कडक होणे वा त्याची कठोर अंमलबजावणी, पोलीस संरक्षण वाढविणे, पुरुषांची मानसिकता बदलणे अशा सूचना पुढे आणल्या जातात,पण पुरुषाची कामीच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी या विषयांवर कधीच कुणी चर्चा करीत नाही.
मानवीजीवनात महिलेला मुल होण्याचे शरीरनियम निसर्गाचे, परंतु शरीरसंबंधाचे नियम मात्र माणसांनी केले आहेत. यामुळे मानवी मनात आणि शरीरात जो एक आंतर्विरोध निर्माण झालेला आहे, त्याला सामोरे जाताना, त्याचा तात्काळ परिणाम हा समाजातील लैंगिक गुन्हेगारीत परावर्तित होतों. कारण शरीरसंबंधावर मेंदू आणि हार्मोन्सच्या नैसर्गिक कार्यात हस्तक्षेप केल्यासारखे होते. ज्याचे परिणाम निव्वळ लैंगिकतेपुरते मर्यादित न राहता, ते स्त्री-पुरुषांमध्ये मानसिक अशांती, अस्वस्थता, प्रक्षोभ, विकृती अशा पद्धतीने दृश्य होऊ लागतात.निसर्गाने सजीवांच्या जगण्यासाठी अन्नाची भूक आणि लैंगिक भूक अत्यावश्य केली आहे. जगण्यासाठी आणि संपूर्ण प्राणिजात टिकून राहण्यासाठी अन्नाची आणि लैंगिक भूक अशी निसर्गाची व्यवस्था आहे. त्यानुसार प्राणिजातीला पवित्रे घेण्यास भाग पाडले जाऊन शमविल्या जातात. त्या कोणत्याही प्राण्यांच्या ऐच्छिक नियंत्रणाखाली नसतात. शिवाय या दोन भुकांअभावी सजीव प्राणी विनाशाकडे जातात. मात्र विनाशाप्रती संघर्ष करण्याच्या सजीवांच्या आंतरिक गुणधर्मातून या भुका शमविण्याचा प्रयत्न सर्व प्राणी करतात. बुद्धिमान मनुष्यप्राणी तर हा प्रयत्न आटोकाट करतो. अन्नाच्या भुकेसाठी चोरी, मारामारी आणि लैंगिक भुकेसाठी जबरदस्तीच्या संबंधाची गुन्हेगारी केली जाते.
शरीराच्या पलीकडे निरपेक्ष प्रेम नावाची गोष्ट असते. भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये निसर्गानेच प्रजननासाठी ओढ निर्माण केली आहे. हे आकर्षण सापेक्ष असते. पवित्र असते. आकर्षण, अभिलाषा आणि वासना यात मुलतः मोठा फरक असतो. आकर्षणानंतर सहवासातून प्रेम निर्माण होते. तर आकर्षणानंतर सहवास लाभला नाही तर त्याची जागा वासना घेते. या वासनेतूनच विकृती निर्माण होऊन महिलांवरील लैंगिक छळाचे रूप धारण करते.या बाबींचा विचार करणची वेळ आली आहे.
बलात्काराची प्रक्रिया प्रथम मेदूत घडते. नंतर संधी मीळताच ती वास्तवात उतरते. बहुसंख्य पुरूष मनातल्या मनात महिलांवर बलात्कार करीत असतात. गर्दीत महिलांना चोरटा स्पर्श करून अथवा लांब राहून त्यांच्या देहाचे नेत्रसुख घेणारी मडळीही आपल्या समाजात कमी नाहीत. आपल्या कामुक भावनांना शांत करण्यासाठी अनेकजण चित्रपट, दूरचित्रवाणी , इंटरनेट अथवा पुस्तके आणि अश्लिल सिडीची मदत घेत असतात. स्त्रीसुख हे जगातील परमोच्च सुख असल्याचे मानल्यामुळे हा गोंधळ होतो. तहानभूक याचप्रमाणे शरीरसुख ही एक मुलभूत गरज आहे, इतकेच मानायला हवे. त्याला अवास्तव महत्त्व प्राप्त झाल्याने हा घोटाळा होतो. स्त्रीदेहाची शास्त्रीय ओळख न झालेली, स्त्रीसुखापासून वंचित असलेली, कामभावनेचा अवास्तव बाऊ करणारी आणि ज्यांना खर अर्थाने प्रेम मीळाले नाही, अशी माणसे बळजबरीने आपली वासना शमविण्यासाठी बलात्कार करतात.
नुसते कायदे करून हा प्रश्न सुटणारा नाही. मानसिकता बदलण्यासाठी कायदे उपयोगाचे नसतात. आणि आपली प्राचिन संस्कृती आणि धर्म तर स्त्री - पुरूषांच्या असामानतेवरच आधारीत आहेत. आपण माणूस आहोत आणि माणूसच राहणार . सभ्य, सुसंस्कृत माणूस होण्याचा प्रयत्न करायला हवा. कोणताही माणूस जन्मतःच रानटी जनावर म्हणून जन्म घेत नाही. अथवा कोणीच जनमतः ‘अण्णा हजारे’ नसतो.
महिलांचे लैंगिक शोषण, महिला अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणाकडेही निरपेक्ष आणि स्वच्छ दृष्टीने पहायाला हवे. पुरूषप्रधान संस्कृतीवर बेतलेल्या आपल्या धर्मग्रंथांचाही नव्याने विचार व्हायला हवा. आपल्या चाली-रिती, धार्मीक बंधने, पुराणकथा, रिवाज या सर्व बाबींचा आजच्या आधुनिक युगात शास्त्रीय कारणमीमांसा करून विचार करायला हवा.

- भगवान निळे

Thursday, August 22, 2013

अंधश्रद्धा

गेली वीस वर्षे महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी आवाज उठविणारे व जादूटोणाविरोधातील विधेयकासाठी प्रयत्न करणारे ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक डॉ नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओन्कारेश्वर पुलावर अज्ञात मारेकर्‍यांनी गोळ्या घालून निर्घृण हत्या केली. पुरोगामी समाजसुधारणांचा विचार सातत्याने धडपडणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. दाभोलकर यांची हत्या महाराष्ट्रातील पुरोगामीत्व आणि चळवळीचा पराभव आहे. महाराष्ट्रात समाजसुधारकाची हत्या होण्याची ही पहिलीच वेळ आहे. नव्या विचारांना सुरूवातीला विरोध होतो पण त्या विरोधापोटी कोणाची हत्या केली गेली असे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते.समाजात ज्या ज्यावेळी बदल घडवायचा असतो त्या त्यावेळी नवा विचार माडावा लागतो. नवा विचार माडताना जुन्या विचाराला मुठमाती द्यावी लागते. नवा विचार माडणार्‍यांना नेहमीच विरोध होतो. पण कालांतराने हाच विरोध करणारा समाज नवा विचार स्वीकारतो हे वास्तव आहे .
वैचारिक लढाई ही विचारानेच लढली गेली पाहिजे. मुस्कटदाबी करून, व्यक्तीला मारून हे विचार कधीही मरत नाहीत. उलट ते अधिक वेगाने फोफावतात. समाजातील प्रतिगामी मडळी जुने विचार, जुन्या चालीरीती, जुन्या खुळसट रुढी छातीशी कवटाळून बसतात. त्यांना नवा विचार पेलत नाही. मग ते धर्माच्या, संस्कृतीच्या, परंपरेच्या गोंडस नावाखाली पुरोगामी विचाराला विरोध करतात.
पुराणमतवादी मनडळी आग्रही, जहाल आणि हिंसक असतात. त्यांना नवा विचार अंगावर झुरळ पडल्यासारखा वाटतो. त्यांना नवा विचार करणारांचा तो विचार माडण्याचा घटनात्मक नैतिक अधिकार आहे हेही मान्य नसते. इतकेच नव्हे तर, नवा विचार माडणार्‍यांचे जगणेही त्यांना मान्य नसते. अशाच प्रतिगामी , पुराणमतवादी हिंसक मनडळींपासून गेल्या काही दिवसांपासून डॉ. दाभोलकरांना अंध:श्रद्धाविरोधी विधेयकावरून धमक्या द्यायला सुरूवात झाली होती. मात्र एकटे दाभोलकर या मनडळींना पुरून उरले होते.
डॉ दाभोलकर हे मुळचे सातार्‍याचे. त्यांचे कुटुंब हे सातारा जिल्ह्यातील दाभोल या गावचे म्हणून त्यांचे आडनाव दाभोलकर असे पडले. डॉ बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा ’ या चळवळीतून डॉ. दाभोलकरांचा संबंध पुरोगामी चळवळीशी आला. अंधश्र द्धा निर्मुलन संघटनेच्या राज्यात 150 शाखा कार्यरत आहेत. गेल्या दहा वर्षात त्यांनी राज्यात दहा हजार शिक्षकांचे अंधश्रद्धा निर्मुलनाच्या दृष्टीने प्रशिक्षण घेतले आहेत. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादकपद त्यांच्याकडे बारा वर्षापूर्वी प्रा. ग. प्र. पधान यांच्याकडून आले. त्यामुळे त्यांच्या चळवळीला अधिक गती ि’ळाली.
महाराष्ट्रात सामाजिक विचार मां डणार्‍यांची मोठी परंपरा आहे. पण ती खंडित झाली होती. दाभोलकरांनी स्वातंत्र्यानंतर खंडित झालेली ही विचार प्रबोधनाची परंपरा प्रतिकूल स्थितीतही नेटाने सुरू ठेवली होती.
त्यांचे महाराष्ट्राच्या वैचारिक चळचळीतील स्थान मोठे होते. बाबा आमटे, बाबा आढाव, श्याम मानव, यांच्याप्रमाणेच त्यांनी या परंपरेतून महाराष्ट्रात अनेक तरुण प्रेरित केले होते. कोणाच्याही श्रद्धा न दुखवता केवळ उघड्या डोळ्यांनी दिसणार्‍या अंध:श्रद्धांवर त्यांनी विवेकाने वार करण्याचे अखंड काम केले.
खरे पाहता, स्वातंत्र्यानंतर सामाजिक परिवर्तनाची चळवळ गतिमान व्हायला हवी होती. शिक्षणाचा प्रसार आणि प्रमाण वाढल्यामुळे ती अधिकच वेगाने पुढे जायला हवी होती. पण तिला पाहिजे तसा वेग आला नाही. उलट, सुधारणांना विरोध करणारा वर्ग एवढा प्रखर झाला की आपल्याला न आवडणारे विचार मांडणार्‍यांना जगण्याचा अधिकार नाही असे म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली.
धर्मार्तंडानी आणि संस्कृतीचा ठेका घेतलेल्यांनी समाज सुधारणेविषयी चुकीच्या भावना जनमाणसात पेरल्या. समाज सुधारणेचा विचार म्हणजे धर्मविरोधी विचार असा समज दृढ करण्यात आला. धर्माचा राजकारणासाठी वापर करणारांनी अशा समाजाला खतपाणी घातले. धर्मातल्या कालबाह्य रुढींचे विश्‍लेषण करणे आणि अशास्त्रीय रुढींचा निषेध करणे म्हणजे धर्माचा अपमान आहे असा प्रचार जाणूनबुजून करण्यात आला. धार्मीक उन्मादाने प्रेरित झालेला तरुण वर्ग सामाजिक चळचळीला विरोध करायला लागला आणि तसे करणे हेच धर्माचे कार्य आहे असे मानायला लागला. सामाजिक चळवळ सुरू असते तेव्हा ती करणारे लोक संख्येने कमी असतात आणि असे विपरीत धर्मकार्य करण्यात धन्यता मानणारे, सुधारणांना विरोध करणारे संख्येने जास्त असतात.हे माठे दुदैव आहे.
लोकांचे दगड खाऊन आणि प्रतारणा सहन करून जे लोक नवा विचार माडतात ते संख्येने हाताच्या बोटावर मोजण्याइतके असतात. सुधारणांना विरोध करणारे संख्येने जास्त असल्याने राजकीय नेते सुधारणांना उघडपणे पाठींबा देत नाहीत. राजकीय नेत्यांना बहुसंख्यकाची मते गमवायची नसतात. लोकांच्या हिताचा विचार लोकांनाच आधी कळत नाही. पण त्यांची नाराजी ओढवून घेऊन तो मांडत राहिले पाहिजे हा सुधारकांचा बाणा असतो. पण राजकीय नेते लोकांना नाराज करीत नाहीत. त्यांना आवडेल ते बोलत राहतात. त्यांच्या हिताच्या पण त्यांना नाराज करणार्‍या जादूटोणाविरोधी विधेयकासारख्या विषयात राजकीय नेते नेहमीच बोटचेपेपणाची भूमीका घेतात. ती भूमीका चुकीची आहे हे त्यांना कळते पण मतांच्या स्वार्थापोटी ते सुधारणांचा मो कळेपणाने पुरस्कार करीत नाहीत. परिणामी दाभोलकरांसारखे सुधारक एकटे पडतात आणि धार्मिक उन्माद पोटी त्यांना विरोध करणार्‍यांना, नेत्यांच्या सोयीस्कर मौनामुळे बल मिळते.
महाराष्ट्र सरकारच्या अंध:श्रद्धाविरोधी विधेयकाला फाटे फोडण्याचा काही लोकांचा उद्योग चालला आहे.ज्यांच्या मनातल्या आणि ते समाजात प्रसार करीत असलेल्या भाकड कल्पनांना शह बसणार आहे अशा मडळींना हा कायदा नको आहे. आज काही हिंदुत्ववादी संघटना या विधेयकाला विरोध करायला पुढे सरसावल्या आहेत. त्यातल्या ‘सनातन प्रभात’ सारख्या संघटनांचा विरोध समजून घेता येतो. कारण, ही संघटना मुळातच सनातनी आहे. आपल्या धर्मातल्या सर्व दुष्ट रूढींना आणि कालबाह्य परंपरांना आधुनिक रूप देऊन पुन्हा समाजावर थोपण्याचा त्यांचा उद्योगच आहे. धर्मतल्या रूढींचा बदलत्या काळाच्या संदर्भात फेरविचार केला पाहिजे असा विचार मांडणार्‍या आगरकर, फुले अशा समाजसुधारकांमुळे आपला समाज सुधारला आहे. पण, या समाजाला पुन्हा त्या काळ्या कालखंडात नेण्याचा या काही हितसंबंधी मांडळींचा डाव आहे. अशा संघटनेने या अंध:श्रद्धा विरोधी कायद्याला विरोध होत असेल तर तो त्यांच्या स्वरूपाला धरूनच आहे . पण वारकरी संप्रदायातल्या काही संतांनी,आणि हिंदुत्ववादी संघटनांनी या विधेयकाला विरोध करावा हे त्या त्या तत्त्वज्ञानाशी विसंगत आहे.
सामान्य माणूस धर्मवेडा असतो. तो परंपरा आणि रूढींचा त्याग करण्यास सहजा सहजी तयार होत नाही पण त्यांना तसे काही सांगायला गेलो तर तो नाराज होतो. आजकाल कोणत्याच पक्षाचे नेते समाजाला काही नवे शिकविण्यास तयार नाहीत. म्हणून या हिंदुत्ववादी पक्षांनीही समाजाची उगाच नाराजी नको म्हणून या विधेयकाला विरोध करायला तर सुरूवात केली आहे. त्यांनी लोक अधिक खुष व्हावेत म्हणून या विधेयकाला धर्मविरोधी ठरवून लोकांना भडकवायला सुरूवात केली आहे.
वारकरी संप्रदायाचीही अवस्था अशीच आहे. संतांना धर्माच्या नावावर चालणारे ढोंगधत्तुरे मान्य नव्हते, ही बाब वारकरी संप्रदायाला माहित नाही काय? या विधेयकात संताचाच विचार माडलेला आहे. श्रद्धा आणि अंध:श्रद्धा यातली सीमारेषा ही धूसर असून एकाला जी श्रद्धा वाटते ते दुसर्‍याला अंध:श्रद्धा वाटू शकते. म्हणून श्रद्धा ही व्यक्तिसापेक्ष असते असे नाही. काही अंध:श्रद्धा या व्यक्तिनिरपेक्ष असतात. डोक्यावर ’रशीचे दोन तुकडे आपटले म्हणजे रोग दुरुस्त होत नाहीत, सर्जरीचे कसलेही शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीने केवळ बोटाने शस्त्रक्रिया करतो म्हणणे हे थोतांड आहे. या गोष्टी कोणालाच खर्‍या वाटणार्‍या नाहीत. त्यांच्यावर बंदी आणून त्यांना शिक्षा केली पाहिजे. या कामात कसलेही वैचारिक मतभेद आडवे येण्याची सुतराम शक्यता नाही.
हे विधेयक गेल्या अकरा वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याला मधूनच मान्यता मीळाल्यासारखे वाटते पण कोणी तरी काही तरी अडथळा आणतो. हे समाजाच्या हिताचे असल्याने ते प्रलंबित राहून चालणार नाही . समाजात अनेक प्रकारच्या अंध:श्रद्धा रूढ आहेत आणि त्या पायी लोकांचे जीवन खडतर बनलेले आहे. अनेकांची अनेक प्रकारे फसणूक होत आहे. समाजात शिक्षणाचे प्रमाण जसे वाढत जाईल तशा या अंध:श्रद्धा कमी होतील असे वाटले होते. पण उलट त्या वाढत आहेत. कारण या अंध:श्रद्धांना काही तरी वैज्ञानिक अर्थ आहे असे या सुशिक्षित लोकांना सांगितले जात आहे. अडाणी, खेडूत आणि अशिक्षित लोक तर अंध:श्रद्धांच्या आहारी गेलेले आहेतच पण सुशिक्षितही त्यापेक्षा काही वेगळे नाहीत. एकदा सुशिक्षितही अशा दुष्ट रूढींच्या आहारी जायला लागला की त्यांचे अनुकरण करीत अशिक्षित स’ाजही त्यांचे पालन करायला लागतो. कारण ज्या अर्थी एवढे शिकलेले लोक या रूढी पाळतात त्या अर्थी त्यात काही तरी अर्थ असणारच असे त्यांना वाटायला लागते.
काही मांडळीनी अंधश्रद्धेचे दुष्परिणाम न पाहता हे विधेयक धर्माच्या विरोधात असल्याची आवई उठविली आहे. विधेयक मजूर होऊन ते लागू झाल्यास कोणालाही सत्यनारायण पूजा घालता येणार नाही, आपल्या घरात आपल्या मर्जीने यज्ञ करणे हाही गुन्हा ठरेल, देवाचे नाव घेता येणार नाही, कीर्तन केले की अटक होईल अशी अतिशयोक्त विधाने करून हे लोक धार्मीक प्रवृत्तीच्या लोकांना या विधेयकाच्या विरोधात भडकावित आहेत. खरे पाहता कोणत्याही धर्मातील तत्त्वज्ञानाला आता महत्त्व उरलेले नाही. केवळ कर्मकांडांना महत्त्व आले आहे . ही कर्माकांडे अंध:श्रद्धांना जन्म देणारी आहेत. ती काळाच्या बदलानुसार बदलली जात नाहीत. अंधश्रध्देपोटी गेल्या दहा वर्षात राज्यात किमान तीन हजार जणांचे बळी गेले आहेत. त्यामुळे हे अंधश्रद्धा विरोधी विधयेक संमत करून तसा कायदा पारीत करून महाराष्ट्राने देशात नवा पायंडा घालून द्यायला हवा. हीच खर्‍या अर्थाने दाभोलकरांना आदरांजली ठरेल.

भगवान निळे

Tuesday, August 20, 2013

निळ्या वातीच्या उजेडात

उभ्या भरगच्च पिकात कसा येईना ढेकर?
घाम गाळून गाळून मला दिसेना भाकर !

नाही शिकले मी शाळा दुख्ख पाचवीला पूजले
ढकलत सार आयुष्य सुख गर्भात कुजले !

भूक चिकटली पोटाला नाही दानही चोखाया
आहे फाटक लुगड लाज नागडी राखाया !

देव देवळात बसे आहे का त्याला लाज ?
आम्हा नागड करून त्याला मढविती साज !

निळ्या वातीच्या उजेडात स्वप्न उद्याचे पाहते
आटलेल्या थानाला भूख लेकरू चोखते !

धन्यासंग रडताना रात सरता सरेना
त्याच्या उबदार मिठीत पाखरू धरता धरेना !

नाही लावली आम्ही दोन्ही हाताना ती धार
माझी लेकर करतील उद्या गरीबीवर वार !!

Wednesday, August 7, 2013

कधी वाटते

कधी वाटते आभाळाला उडी मारुनी स्पर्श करावा
कधी वाटते इंद्रधनूमधी नवा देखणं रंग भरावा !!धृ !!

सांज ओली गहिवरलेली
आठवांना येते भरती
तुझा किनारा जगावेगळा
क्षितीजावरती गात्र उमलती
हाकारताना तुला अंतरी, वार्यावरती शब्द तरावा !!१!!

वेचुनी घेते स्वप्न बावळी
जागोजागी सांडलेली
उरते होऊनी तुझ्या भोवती
आरस सुखाची मांडलेली
क्षण हळवा तव मिलनाचा, जन्मोजन्मी असा उरावा !!२!!

निळ्या मनाच्या आभाळाला
पाऊले तुडवी काळोखाची
चिंब भिजता तुझ्या मिठीतून
ओळख पटते नव्या मुलुखाची
गंध कस्तुरी या देहाचा, हक्काने तू पिऊन घ्यावा !!३!!

बुद्धाच्या नावान



जयभीम म्हणण्या लाज वाटते काय करू मी राव ?
पण बुद्धाच्या नवान खंडोबा तू तरी पाव !!धृ !!

हुंडा घेवूनी लगीन केल
हळद, बाशिंग माथी बांधल
नवस केला नि मुलगा झाला
बाबांच्या नवान नारळ वाहिला
पोटासाठी शहरी आलो सोडूनी माग गाव !!१!!

राखीव जागा म्हणुनी तरलो
सचिवालया मधी चिकटलो
मोर्चामधली गर्दी वाढली
जयंतीची मग पावती फाडली
बदलूनी टाकीन म्हणतो आता माझ मी आडनाव !!२!!

चार भिंतीत कोंडूनी घेतो
अन्यायाच्या कथा वाचतो
विसरुनी सारी नातीगोती
स्वार्थासाठी खाल्ली माती
धेड हिंनाविता अजुनी बसतो जहरी माझ्या घाव !!३!!

शोधू कुठे मी आता

शोधू कुठे मी आता, माझा सखा तो भीम
दिसतो मला न आता, लढणारा माझा भीम

धरतीने धरले पाय, आभाळाने ओढले हात
वाराही झाला फितूर, त्यानेही केला घात

पुसण्या न आली डोळे, चुकार नदी माय
नभी फोडती हंबरडा, चुकलेली रानी गाय

रोज अब्रू झाकताना, बहिणींची विरली वस्त्रे
स्वप्नातही भेडसावी, नजरेची विखार शस्त्रे

विझुनी गेल्या मशाली, हाती आल्या पखाली
झिंगलेला समाज मागे, दैवाकडे खुशाली

थंडावले सारे बंड, नेतेही निघाले षंढ
जिन्दगानीत आमुच्या, का उजेडाचा खंड ?

मातीतुनी निघाला, निढळया घामाचा गंध
पाजळा नवी हत्यार, युद्धाचा जपुनी छंद

कळले तुला न तेंव्हा

कळले तुला न तेंव्हा, माझा आधार होता
हा जीव तुझ्यासाठी, माझा उधार होता

माझ्या मिठीत मी तुला, दिलेला आकार होता
दैवावर रुसण्याचा तुझा , रुसवा टुकार होता

शरीराच्या पलीकडल्या , प्रेमाचा सार होता
माझ्या अंतरीचा तो, छुपा होकार होता

छळणारा हुंदकाही, जीवाला घोर होता
अश्रूंनी काळजावर, कोरलेला प्रहार होता

आभाळ रंगविण्या , का तुझा खार होता ?
जगण्याच्या नियमांना, माझा नकार होता
फुलांसह फुलण्याचा, तेथे अभिभार होता
जो केला वार मी तो , वारही सुमार होता

जपलेल्या जखमांना , सुखाचा भार होता
नियतीशी झोंबताना, माझा डकार होता

तुझी आठवण येते

  1. ती : सळसळत्या वार्यात , खळखळत्या पान्यात
    तो : टळटळत्या उन्हात, भळभळतय जखमेत
    ती: तुझी आठवण येते मला या भयाण रातीत....
    ती : गेला कष्टात दिवस निघून
    मी पडले थकून भागून
    रात झोपली उशाशी माझ्या
    तुझ्या आठवणी झाल्या ताज्या
    तुही जागा असशील तिथं त्या परक्या शहरात !!1!!
    तुझी आठवण येते मला या भयाण रातीत....

    तो: केलंं भुकेनं परागंदा
    फीरतो धुंडीत नोकरी धंदा
    इथं गर्दीला नाही चेहरा
    सावलीवरही लागे पहारा
    मी फिरतो अनवाणी भीती घेऊन ऊरात !!2!!
    तुझी आठवण येते मला या झगमगत्या शहरात.....

    ती : गेलं सुकून सारं रान
    पाखरं हिंडती शोधत दाणं
    पोरं बिलगती खायाला आनं
    नाही खर्चाया फुटकं नाणं
    कशी एकटी मी राहू अशा जालीम दुनियेत? !!3!!
    तुझी आठवण येते मला या कुडाच्या घरात....

    तो: तुझ्या मिठीत विसराया सारं
    ठेव जपून माझ्या खुणा
    गाणं मुक्तीचं गायाला
    मी परतुनी येईन पुन्हा
    मग ’फुलांनी सजवून काढू भावी सपनांची वरात !!4!!
    तुझी आठवण येते मला तुला पाहिल्यावर माझ्यात

विसरलोच आम्ही



कपडे कितीही घातले तरी, सावली नागडी असते
मायेची उब देणारी तेव्हा, आईची गोधडी असते

लाथाडले कितीही परंतु, दु:ख पायातच घुटमळते
जन्मोजन्मीचे मैत्र जसे, सोन्याची लगडी असते

मुंग्यांना साखर घालणारे, कोरडे अश्रू ढाळतात
काळीज तयांचे मात्र , नेहमीच दगडी असते

संकटाच्या समयी पहा, माणसेच धावून येती
मदतीला देव येतो, ही श्रद्धा बेगडी असते

धन्य जाहले जाती-जातीत रेषा ओढणारे
डोक्यावर मुकुट नव्हे, त्यांच्या पगडी असते

संसदेचा बाजार मानडणारे, खुलेआम भांडती जेव्हा
जनतेला लुटण्यासाठी, घातलेली फुगडी असते

देवाधर्माच्या लागुनी नादी, हाय! विसरलोच आम्ही
एकजूट भुकेकंगालांची, बंदुकीहून तगडी असते

हिरव्या हिरव्या रानात माझ्या

हिरव्या हिरव्या रानात माझ्या मोर नाचतो बावरा
थुई थुई नाचे मनात माझ्या कृष्ण मुरारी सावळा !!धृ !!

अंगी माझ्या खुलू लागले
दिवस उन्हाचे कोवळे
तरुण्यामधी पाय टाकिता
झुगारले मी सोहळे
निळे जांभळे रंग खुलविती प्रीतीचा हा सोनमळा !!१!!

मीच बसले हरवून मजला
वार्यावरती मन झुले
कवेत घेता तुला स्मरूनी
आभाळाचे दार खुले
डोळे मिटुनी मला पाहू दे दोन जीवांचा सोहळा !!२!!

बावरले मी तुझीच राधा
मलाच माझे कोडे पडे
मीच झाले अवघे गोकुळ
आकाशातुनी पुष्प सडे
मला भावला जगावेगळा स्वभाव तुझा वेंधळा !!३!!

चेहरा तुझा दिसो

उघडताच मी डोळे, चेहरा तुझा दिसो
जरी मिटले असले तरीही , स्वप्नही तुझे दिसो !!धृ !!

ज्या वाटेवर तुझ्या होत्या पाऊलखुणा
त्या वाटेवर पुन्हा जाऊ दिले ना कुणा
तू आरसा झाली असता, चेहरा माझा नसो !!१!!

चिंब भिजुनी पावसात, उरी जखम सांभाळताना
पाणी पावसाचे आणि , अश्रू नेमके ओळखताना
जन्मोजन्मी कधीही, मी ना असा फसो !!२!!

मी वाट पहिली तुझी, ना लवली पापणी माझी
जी जखम दिली तू ताजी, मी भोगली राजी राजी
तुला नेताना तो यमही, आकाशी गाली हसो !!३!!

मरणाची नाही भीती, ते तर तुझ्याच हाती
जगणे घेउनि येती वांझोटी स्वप्न रिती
पण कफानाच्या जागी ती , ओढणी तुझी असो !!४!!

मला भूतकाळ जगायचा नाही

आपली पहिली भेट झाली
तो क्षण सुदैवी की दुर्दैवी याचा मी कधीच केला नाही विचार
आपली भेट झाली हेच महत्वाचे .

आपण दुरावलो _
मी दुखावलो.

तू दुखावालीस की नाही
याचाही मी विचार करीत नाही.
फक्त
आपण दुभंगलो
त्या वळणावर स्वताला सोडून
मी एकटाच माघारी परतलो .
मनसोक्त आंघोळ करून
मी घेईल आता दीर्घ झोप
नि, झोपेतच
आपण मिळून उपभोगलेल्या सुखांच्या
थडग्यावर मेणबत्ती पेटवून
पुन्हा गाढ झोपी जाईल .
आत्ता :
माझ स्वप्न माझ असेल
माझा क्षण माझ्या एकट्याचा असेल
माझी सावली माझी असेल.


तुला पुन्हा भेटवस वाटत नाही मला
मला भूतकाळ जगायचा नाही...