प्रत्येक अनिकेत संध्याकाळी
चतकोर कागदावर सारं शहर रेखाटून
आपण चालू लागतो
शहर खिशात कोंबून
शहराच्या त्वचेवर पावलांचे ठसे कोरीत.
त्यावेळी या शहरातील
मृत्युच्या भयाण आवाजाचे प्रतिध्वनी
आपल्या काळजावर न उमटताच
विरघळून जातात आसमंतात .
मग आपण
या शहराचे भवितव्य आखीत
उभारत जातो इप्सित नवं कोरं शहर
आभाळभर.
शहराचे आराखडे पूर्ण करीत करीतच
आपण येतो फेसाळणार समुद्रापर्यंत नकळत
नि,
भिरकावून देतो शब्दांच्या पलिकडलं दु:ख
खिशात चुरगळलेल्या शहराच्या चेहज्यानिशी
आत्महत्या करणार्या तरूणीसारखं
खवळलेल लाटांमध्ये
अन्
छातीत समुद्र घेऊन परततो आपण
आपापल्या चार भिंतींच्या जगात.
प्रत्येक रात्री शहराचे मालक आपणच असतो....
No comments:
Post a Comment